तळोशी झाले टॅंकरमुक्त 

तळोशी झाले टॅंकरमुक्त 

केळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून शिवकालीन तळ्यातील गाळ काढण्यात आला. सध्या तळे पूर्ण भरल्याने पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. 

गावाच्या चारही बाजूंना उंच उंच डोंगररांगा आहेत. येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. तनिष्का गटातील महिलांनी गाव पाणीटंचाईमुक्त करण्याचा निर्धार केला. त्यांना सरपंच संतोष चिकणे यांच्यासह ग्रामस्थांची साथ मिळाली. तनिष्कांच्या मागणीनुसार शिवकालीन तळ्याचे खोलीकरण व तळ्यातील गाळ काढण्यासाठी सकाळ रिलीफ फंडातून दोन लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. या निधीतून तळ्यातील गाळ काढण्यात आला. या तळ्यात पाणीसाठाही चांगला झाला आहे. तळे भरल्यावर दोन ते तीन महिने गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही. 27 फूट रुंद, 70 फूट लांब, 30 फूट खोल असे तळे असून, सुमारे एक लाख लिटर पाण्याचा साठा या तळ्यात होऊ शकतो. सकाळ रिलीफ फंडामुळे तळोशीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे, असे ग्रामसेवक विकास सुरवसे यांनी सांगितले. 

सकाळ रिलीफ फंड व तनिष्कांच्या माध्यमातून टंचाईग्रस्त तळोशीचा चेहरामोहरा बदलत असून, गावाच्या विकासासाठी ग्रामस्थ, महिला मुंबईकर मंडळाचे सहकार्य मिळत असल्याचे सरपंच चिकणे यांनी सांगितले. 

""सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्यामुळे गावाचा पाणीप्रश्न कायमचा सुटला असून, तनिष्का गटाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवणार आहे.'' 
- वनिता बैलकर, तनिष्का गटप्रमुख, तळोशी (ता. जावळी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com