कोयनेची वीज बंद पाडा : उदयनराजे 

udayanraje
udayanraje

सातारा : धरणग्रस्तांचे प्रश्न अनेक वर्षा पासून प्रलंबित आहेत. प्रकल्प पूर्ण होताहेत पण प्रश्न सुटण्यासाठी एक पिढी संघर्ष करण्यातच गेली. बस्स... कोयनेची वीज बंद करा मग बघा  सगळे तुमच्याकडे आपसुप लक्ष देतील असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

श्रमिक मुक्ती दल यांच्यावतीने धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दुष्काळग्रस्त यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी गेले 21 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन सुरु आहे. आज (बुधवार) सातारा जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांबाबत जिल्हा  प्रशासन आणि आंदोलकांची बैठक दुपारी तीनच्या सुमारास सुरु झाली. दरम्यानच्या काळात खासदार उदयनराजे हे आंदोलन स्थळी आले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. 

मुख्यमंत्री भुईंजला येणार आहेत तिथेच त्यांनी तुमच्यासमवेत बैठक घ्यावी. कशाला आपण मुंबईला जायचे. आपली जमीन, आपले पाणी, आपली वीज याचा विचार झाला पाहिजे. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक प्रकल्प झाले. पण तुमचे प्रश्न सोडविण्यात दिरंगाई झाली. एक पिढी संघर्षात गेली.बस्स आता. कोयनेतून वीज जाते ना. ती बंद करा मग बघा आपसुप सगळे तुमच्याकडे येतील. यावेळी आंदोलकांनी सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com