अडीच हजार विद्यार्थी म्हणताहेत, 'सोलापूर विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्र दिलेच नाही..'

अडीच हजार विद्यार्थी म्हणताहेत, 'सोलापूर विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्र दिलेच नाही..'

सोलापूर : सीबीएससी पॅटर्नमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून गुणपत्रिका देण्यात आल्या आहेत. परंतु, सीजीपीए पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना अद्यापही गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. अशा विद्यार्थ्यांची संख्या शहर-जिल्ह्यात सुमारे अडीच हजार आहे. परंतु, सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज भरावयाची 12 सप्टेंबर अंतिम मुदत आहे. 

ठळक बाबी... 
- 2016 रोजी बंद झाला सीजीपीए पॅटर्न 
- जिल्ह्यातील अडीच हजार विद्यार्थ्यांनी दिली यंदा सीजीपीए पॅटर्नमधून परीक्षा 
- पदवी प्रमाणपत्रासाठी गुणपत्रिका बंधनकारक 
- 12 सप्टेंबरपर्यंत आहे पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज भरण्याची मुदत 
- सीजीपीए पॅटर्नच्या विद्यार्थ्यांकडून मुदतवाढीची मागणी 

मी सीजीपीए पॅटर्नमधून परीक्षा दिली आहे. मागील आठ-दहा दिवसांपासून गुणपत्रिकेसाठी हेलपाटे मारतोय. परंतु, त्या कधीपर्यंत मिळणार हे अद्यापही कोणी सांगायला तयार नाही. नव्या कुलगुरु आल्याने विद्यापीठाचे कामकाज सुधारले असेल असा समज होता. परंतु, परिस्थिती जैसे थे च दिसून येत आहे. गुणपत्रिका मिळेपर्यंत पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज भरण्याची मुदत राहावी. - जीवन सोनटक्‍के, विद्यार्थी (अभियांत्रिकी कॉलेज, वैराग) 

विद्यापीठाकडून सर्वच विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची मुदत बुधवार, 12 सप्टेंबरपर्यंतच असेल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे अनेक विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com