Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्रीपदाबाबत आदित्य ठाकरे म्हणाले...

Aditya Thackeray in Vita
Aditya Thackeray in Vita

विटा - बेरोजगारी, दुष्काळ आणि कर्जमुक्त भगवा महाराष्ट्र मला घडवायचा आहे. त्यासाठी संधी द्या. कधी ना कधी तरी मला मुख्यमंत्री म्हणून बघाल, असे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. 

विटा येथे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. 

श्री. ठाकरे म्हणाले, राज्यातील १११ मतदारसंघ व २५ जिल्हे फिरलो. परंतु निवडणूक आहे असे वाटत नाही. इतर पक्ष कोठे दिसत नाहीत. दिसतोय केवळ भगवा. गेल्या पाच वर्षाचे काम बघून जनता आमच्या बरोबर आहे. विरोधी पक्षातील चांगले नेते पक्षात अडकले होते. ते आता महायुतीत आले आहेत. पण यापुढे शिवसेनेत अपक्ष आमदारांना स्थान मिळणार नाही, असेही श्री. ठाकरे म्हणाले. 

श्री. ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे काम आम्ही करून दाखविले आहे. सत्ता येते, सत्ता जाते. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी मला निवडणूक लढवायची आहे. मला मुख्यमंत्री, मंत्रीपद द्यायचे हे जनतेच्या हातात आहे. सत्ता असो किंवा नसो लोकांची साथ करायची आहे. गेल्या दशकात दुष्काळमुक्त महाराष्ट्र व्हायला पाहिजे होता. पाच वर्षे जे शिवसेनेने काम केलं ते लोकांच्या समोर आहे. विविध आंदोलने केली. दहा लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी रूपये मिळवून दिले आहेत. गाव ते शाळा अशा पंचवीस हजार बसेस सुरू करावयाच्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com