Vidhan Sabha 2019 : शिरोळ अखेर स्वाभिमानीकडे 

Vidhan Sabha 2019 : शिरोळ अखेर स्वाभिमानीकडे 

जयसिंगपूर - आठवडाभरापासून शिरोळ विधानसभेची उमेदवारी स्वाभिमानी पक्षाला मिळणार की राष्ट्रवादी यावर आज रात्रीच्या मुंबईतील बैठकीनंतर पडदा पडला. शिरोळची जागा स्वाभिमानीला मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. स्वाभिमानीच्या या होमपिचवर माजी खासदार राजू शेट्टी व सावकर मादनाईक लढणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. 

दोन्ही काँग्रेस आणि स्वाभिमानी यांची लोकसभेच्या धर्तीवरच आघाडी निश्‍चित झाल्यानंतर शिरोळच्या जागेचा तिढा निर्माण झाला होता. शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गेल्या पाच वर्षांपासून चांगली तयारी केली आहे. मात्र, आघाडीमुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात होते. शिरोळ हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला असल्याने शिवाय चळवळ टिकविण्यासाठी शिरोळ स्वाभिमानीकडे जाईल असे राजकीय तर्क होते ते आज खरे ठरले. 

लोकसभेतील पराभरावाचा वचपा काढण्याची संधी यानिमित्ताने स्वाभिमानीला मिळाली आहे. मात्र, विधानसभेच्या मैदानात शेट्टी यांनी उतरावे कि मादनाईक यांनी याबाबत दुहेरी चर्चा सुरु आहे. कार्यकर्त्यांची मते आजमावून याबाबत दोन दिवसात निर्णय होणार असला तरी मादनाईक आणि शेट्टी दोघेही आपले उमेदवारी दाखल करण्याची शक्‍यता आहे. शिरोळ स्वाभिमानीच्या चळवळीचा जनक असणारा तालुका आहे. 

लोकसभेनंतर संघटनेला बळ मिळण्यासाठी विधानसभा लढवून यात विजय खेचून आणण्याचे आव्हान असणार आहे. विद्यमान आमदार उल्हास पाटील यांच्या विरोधात शेट्टी कि मादनाईक याबाबत दोन दिवसात चित्र स्पष्ट होणार असले तरी राष्ट्रवादीचे श्री यड्रावकर यांची कोणती भूमिका असणार यावरही निकालाचे चित्र अवलंबून असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com