Vidhan Sabha 2019 : जतमधून आघाडीतर्फे विक्रमसिंह सावंत यांचा उमेदवारी अर्ज

Vidhan Sabha 2019 : जतमधून आघाडीतर्फे विक्रमसिंह सावंत यांचा उमेदवारी अर्ज

जत - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी कडून विक्रमसिंह सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला. काँग्रेसने विक्रम सावंत यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गड सर करण्याचा दावा केला आहे. 

आमदार विश्वजीत कदम म्हणाले, भाजपने विकासाच्या नावावर दुष्काळी जनतेची दिशाभूल केली. वंचित गावांना पाणी देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. येथील दडपशाही मोडून काढायची, हीच वेळ आहे. 

विक्रम सावंत म्हणाले, तालुक्याच्या आमदारांनी दुसर्‍याला श्रेय जाते म्हणून कर्नाटकातील तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी वंचित गावांना मिळू दिले नाही. जत शहरात मोठ्या प्रमाणावर विकास चालू असताना बगलबच्च्यांकडून अडवणूक केली. मीही विकास करणार नाही, अन् दुसर्‍यालाही करू देणार नाही, अशी मानसिकता आमदारांची आहे. त्यामुळे तालुक्यात दहशतीचे राजकारण मोडीत काढायचे असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही. असे श्री. सावंत म्हणाले.   

 माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, आप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडग, महादेव पाटील, सुजय शिंदे, भुपेंद्र कांबळे, युवराज निकम, पिराप्पा माळी, मुन्नाभाई पखाली, निलेश बामणे, सलीम पाच्छापुरे, गणीभाई मुल्ला  उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com