इचलकंजी : शिरोळ तालुक्यातील राजापूर गाव हे पुन्हा एकदा भयभीत झाले आहे. 2005 मध्ये संपूर्ण पूराने गावाला वेढलेले असताना बोटीतून जाणारे 14 जण बुडाले होते. त्याची धास्ती आजही या भागातील नागरिकांना आहे. गावाला पाण्याचा वेढा असताना प्रशासनाने पाठवलेल्या बोटीमध्ये एक ही नागरिक बसायला तयार नाही. त्यामुळे प्रशासनासमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे.
2005मध्ये शिरोळ तालुक्यात महापूराने प्रचंड हाहाकार उडवला होता. अनेक गावे पाण्याखाली गेली होती. देश पातळीवरून या ठिकाणी मदतीसाठी प्रशासन धावून आले होते. राजापूर गाव संपूर्ण पाण्याखाली वेढले होते. या भागातील नागरिकांना बोटीद्वारे हलवले जात होते. मात्र एका मार्गावर झाडी झुडपे असताना नागरिकांनी केलेल्या गोंधळामुळे बोट उलटली आणि त्यात 14 लोक बुडाले होते.
आज 2005 सारखीच परिस्थिती या गावात निर्माण झाली आहे. त्यामुळे गावातील नागरिक, जनावरे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहेत. सर्व मार्गांवर पाणी आल्यामुळे नागरिकांच्यात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने आज सकाळी येथील नागरिकांसाठी बोट पाठवली. मात्र, एकही नागरिक या बोटीमध्ये बसायला तयार नाही. आम्ही जसे आहोत तसे इथेच राहतो अशीच भूमिका त्यांनी घेतली आहे. विशेषता ज्येष्ठ नागरिकांनी गाव न सोडण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण होत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.