नऊ हजार पाणी नमुने तपासणार

ZP-Satara
ZP-Satara

सातारा - ‘पाणी म्हणजेच जीवन,’ असे म्हणत आपण बिनधास्तपणे त्याचे आचमन करतो. पण, ते किती शुद्ध आहे, हे आपणला माहितीच नसते. आता जिल्हा परिषदेतर्फे केवळ प्रमुख गावांतील नव्हे तर सर्व गावांसह वाड्यावस्त्यांवरील पाण्याच्या जलस्त्रोतांची तपासणी केली जात आहे. तब्बल नऊ हजार ३१० पाणी नुमने घेतले जाणार असून, मेअखेरपर्यंत त्याची तपासणी केली जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य व जिल्हा पाणी स्वच्छता विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी तसेच पावसाळ्यानंतर अशा दोन टप्प्यात रासायनिक तपासणी केली जात आहे. पावसाळ्यापूर्वीची ग्रामीण भागातील जलस्त्रोतांची तपासणी २० मार्चपासून केली जात आहे. पूर्वी केवळ प्रमुख गावांतील पाण्याचे जलस्त्रोत तपासले जात होते. आता सर्व गावे, वाड्या-वस्त्यांवरीलही जलस्त्रोतांची तपासणी केली जाणार आहेत. जलसुरक्षक व प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक यांच्यामार्फत ही तपासणी केली जात आहे. प्रत्येक तालुके, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले आहे.

नदी, विहिरी, आड, कूपनलिका, झरे, पाणीपुरवठा योजना आदी जलस्त्रोतांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी मोबाईलवरील ॲप्लिकेशनचा वापर करून संबंधित ठिकाणी जलसुरक्षक, आरोग्यसेवक जातात. तेथे छायाचित्र काढून पोर्टलवर अपलोड करतात, तर पाण्याचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेत पाठवतात. जेथे जलस्त्रोत आटले आहेत, अशा ठिकाणीही जावून त्याची छायाचित्रे घेणे, शिवाय ते जलस्त्रोत का आटले नाहीत, याची कारणे संबंधित कर्मचाऱ्याला द्यावी लागणार आहेत, अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागातून देण्यात आली.

१४९० - ग्रामपंचायती
९३१० - जलस्रोत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com