निपाणी : दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत गुणांच्या परीक्षेबाबत अजूनही शिक्षण खात्याने स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. तरीही मार्च आणि एप्रिल महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध कालावधीत विद्यार्थ्यांचा उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करायचा की परीक्षेची तयारी करून घ्यायची, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. परीक्षेची तयारी करताना नेमका कोणता अभ्यास किती करायचा? याबाबत विद्यार्थी-पालकांमध्ये गोंधळ आहे. तर अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षेची तयारी करण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी लागणार आहे. गणित, विज्ञान विषयाची विद्यार्थ्यांना चिंता लागून राहिली आहे.(Students were concerned about mathematics and science)
कोरोनामुळे मध्यंतरी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा सराव करता आला नाही. ऑनलाइन-ऑफलाईनच्या माध्यमातून शाळांमध्ये दहावी-बारावीचा जवळपास ७० ते ७५ टक्के अभ्यासक्रम शिकवून झाला आहे. अद्यापही २५ ते ३० टक्के अभ्यासक्रम अपूर्णच आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एक ते दीड महिना लागण्याची शक्यता आहे. अजूनही विद्यार्थ्यांची संख्या कमी-जास्त असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वेळ लागत आहे. प्रात्यक्षिकांचे नियोजन, व्यवस्थापन व मूल्यमापनाची जबाबदारी शाळा, महाविद्यालयांवर आहे.
दरम्यान, दहावी-बारावीच्या कमी केलेल्या २५ टक्के अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणार नाहीत, असे शासनाने स्पष्ट केले आहे. तरी देखील उर्वरित अभ्यासक्रमाचा गुण आराखडा मंडळाकडून जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणत्या भागाला किती महत्त्व द्यायचे, याबाबत विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संभ्रम कायम आहे.(fluctuation in students attendance, it takes time to complete the course)
गणित व विज्ञान विषयांची ८० गुणांची लेखी तर २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असे मूल्यमापन केले जाते. परंतु सध्या काही शाळांमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून वर्ग सुरु आहेत. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्या आहेत, तेथे विद्यार्थी संख्या कमी आहे. त्यामुळे तोंडी परीक्षा कधी? केंव्हा? आणि कशी होईल? असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत.
'दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत अजूनही शिक्षण खात्याकडून स्पष्ट निर्देश आलेले नाहीत. तरीही तयारी म्हणून या दोन्ही परीक्षांची तयारी करण्याची सूचना शिक्षक व विद्यार्थ्यांना केली आहे.'
-रेवती मठद, गटशिक्षणाधिकारी, निपाणी
या आहेत अडचणी
सराव आणि उजळणीसाठी मिळतोय कमी वेळ.
विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यास लागतोय वेळ.
लिखाणाचा सराव पडतोय कमी
गणित, विज्ञान विषयाची विद्यार्थ्यांना चिंता
प्रत्यक्ष प्रात्यक्षिकापासून बहुतांश विद्यार्थी दूर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.