१३८५ ग्रामपंचायतींपैकी मारुंजीचे काम वाखान्याजोगे - मिलिंद टोनपे

पुण्यातील १३८५ ग्रामपंचायतीं मध्ये स्वच्छता हीच सेवा अभियानाचा पंधरवडा साजरा होत आहे. ४६५ ग्रामपंचतींचे काम पूर्णत्वास आहे असून मारुंजी-नेरे ग्रामपंचायतींचे व ग्रामस्थांचे काम वाखान्याजोगे आहे.
१३८५ ग्रामपंचायतींपैकी मारुंजीचे काम वाखान्याजोगे - मिलिंद टोनपे
Summary

पुण्यातील १३८५ ग्रामपंचायतीं मध्ये स्वच्छता हीच सेवा अभियानाचा पंधरवडा साजरा होत आहे. ४६५ ग्रामपंचतींचे काम पूर्णत्वास आहे असून मारुंजी-नेरे ग्रामपंचायतींचे व ग्रामस्थांचे काम वाखान्याजोगे आहे.

हिंजवडी - पुण्यातील १३८५ ग्रामपंचायतीं मध्ये स्वच्छता हीच सेवा अभियानाचा पंधरवडा साजरा होत आहे. ४६५ ग्रामपंचतींचे काम पूर्णत्वास आहे असून मारुंजी-नेरे ग्रामपंचायतींचे व ग्रामस्थांचे काम वाखान्याजोगे आहे. या उपक्रमाची जिल्हा परिषद प्रशास नोंद घेतलीअसून शासकीय पोर्टलवर त्याची माहिती प्रसारित केली जाणार आहे अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मिलिंद टोनपे यांनी शनिवारी (ता. २४) मारुंजीत दिली.

मारुंजी-नेरे ग्रामपंचायत, ग्रामस्थ व सहकार्य

फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच हिंजवडी पोलीसांच्या सहकार्याने स्वच्छता हीच सेवा अभियान राबविण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. टोणपे पुढे म्हणाले, या मोहिमेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. चांगले काम करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे.

स्वच्छतेबाबत प्रबोधन करण्यासाठी सकाळी आठ वाजता मारुंजी येथील अलार्ड कॉलेज पासून मारुंजी ग्रामपंचायत पर्यंत एक किमीच्या टप्प्यात मानवी साखळी करून जनजागृती करण्यात आली. यावेळी हातात स्वच्छतेचा संदेश देणारे पोस्टर आणि तिरंगा ध्वज घेवून विविध क्षेत्रातील मान्यवर, सरपंच, सदस्य प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यामुळे रस्ते तिरंगामय झाल्याने सर्वांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची आठवण झाली.

हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर म्हणाले आपण आपले घर स्वच्छ ठेवतो मग गाव का नाही? ज्या गावात आपण जन्मलो ज्या मातीशी आपली नाळ जुळली आहे. त्याच्याशी गद्दारी न करता परिवर्तनाच्या या लढ्यात आपण सहभागी होऊन स्वच्छतेचा यज्ञ करूया. हभप संग्राम महाराज भंडारे म्हणाले स्वच्छता राखून मन स्वच्छ करा.

प्रास्ताविकात सहकार्य फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी उपक्रमाची माहिती देत सर्वांना सामूहिक शपथ दिली. स्वच्छतेच्या मारुंजी-नेरे पॅटर्नद्वारे सोशल मीडियावर ट्रोल झाल्याने नैराश्येच्या गर्तेत जाऊन पुन्हा स्वच्छता अभियानात मोठ्या हिमतीने सामील होणाऱया अंगद भुसारे व ओंकार भुसारे या पिता पुत्रांचा सन्मान करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कुल व जिल्हा परिषद शाळा मारुंजी, तुकाई माध्यमिक विद्यालय नेरे, पुम्बाज पोलीस भरती अकडमी, अलार्ड ज्युनियर कॉलेज, आयआयएमएस कॉलेजचे विद्यार्थी व लाईफ रिपब्लिक टाऊनशिप मधील नागरिक तसेच लोकमित्र जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य या रॅलीत सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वाती हुलावळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी बुचडे पाटील, मारुंजीचे माजी सरपंच आकाश बुचडे, नेरे गावच्या सरपंच कविता जाधव, दिपाली जाधव, सचिन जाधव, बाबाजी शेळके कृष्णा बुचडे, राहुल जांभूळकर, राहुल जाधव, सोमनाथ वाघोले, विकास जाधव, पै. रविंद्र सोरटे, लालचंद काटे, ग्रामविकास अधिकारी सोमा खैरे डी.बी नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते. हा उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य फाउंडेशनचे सदस्य व मारुंजी-नेरे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गेली २० दिवस विशेष मेहनत घेतली. तुळशीदास घोलप यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com