टपाल कार्यालयांमधून रेव्हेन्यू स्टॅम्पचे वितरण बंद

राज्य शासनाचा टपाल मुख्य कार्यालयाशी याविषयीचा असणारा करार चार महिन्यापूर्वी संपूष्टात
 revenue stamps
revenue stamps sakal

भोसरी : गेल्या एक महिन्यापासून राज्यातील टपाल कार्यालयाध्ये रेव्हेन्यू स्टॅम्प मिळणे बंद झाल्याने कामगार, नागरिक यांची अडचण झाली आहे. राज्य शासनाचा टपाल मुख्य कार्यालयाशी याविषयीचा असणारा करार चार महिन्यापूर्वी संपूष्टात आला आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने या संदर्भात कोणताही नवा अध्यादेश काढलेला नाही. त्याचप्रमाणे रेव्हेन्यू स्टॅम्पही वितरीत होऊ न शकल्याने रेव्हेन्यू स्टॅम्प विक्रीस उपलब्ध नसल्याचे टपाल कार्यालयाद्वारे सांगण्यात आले. रेव्हेन्यू स्टॅम्प टपाल कार्यालयात तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक आणि कामगारांमधून होत आहे.

पगार बील आणि विविध आर्थिक व्यवहारासाठी रेव्हेन्यू स्टॅम्प गरजेचे असते. मात्र गेल्या एक महिन्यापासून हे स्टॅम्प टपाल कार्यालयामधून मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे कामगार वर्ग आणि आर्थिक व्यवहार कराताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे स्टॅम्प टपाल कार्यालयाव्यतिरिक्त इतर दुकानांमध्ये वाढीव किंमतींना विकले जात आहेत. त्याचप्रमाणे टपाल कार्यालयाव्यतिरिक्त रेव्हेन्यू स्टॅम्प मिळणारी दुकाने नगरिकांना माहीत होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना मनस्तापासह आर्थिक नुकसानीचाही सामना करावा लागत आहे.

राज्यशासनाद्वारे रेव्हेन्यू स्टॅम्प विक्रीसाठी टपाल कार्यालयाला सवलतीवर (कमिशनवर) दिले जाते. मात्र राज्यशासन व टपाल मुख्य कार्यालय यांच्यातील करार संपला आहे. त्यामुळे राज्यशासनाद्वारे सवलतीची टक्केवारी ठरवणारा निर्णय प्राप्त न झाल्याने टपाल कार्यालयाला रेव्हेन्यू स्टॅम्प वितरित झाले नसल्याचे मुंबईतील अप्पर मुद्रांक नियंत्रक विभागाद्वारे सागण्यात आले. त्याचप्रमाणे या विषयीची कार्यवाही करण्यासाठीचे पत्रही पुणे नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाला पाठविण्यात आल्याचे या विभागाचे म्हणणे आहे.

पुणे नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाद्वारे सांगण्यात आले की, टपाल कार्यालयाद्वारे २३ फेब्रुवारीला या विषयीचे पत्र प्राप्त झाले आहे. या विषयी शासनाकडे सवलतीच्या पुनर्नोंदणीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात हा करार होऊन टपाल कार्यालयाला पुरेसे रेव्हेन्यू स्टॅम्प पुरविले जातील.

रेव्हेन्यू स्टॅम्प राज्यशासनद्वारे टपाल कार्यालयाला ठराविक सवलतीवर (कमिशन) वितरित केले जातात. मात्र राज्यशासन आणि टपाल कार्यालयातील हा सवलतीचा करार गेल्या महिन्यात संपला आहे. अद्यापही या संदर्भात राज्यशासनाद्वारे कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने राज्यातील टपाल कार्यालयात रेव्हेन्यू स्टॅम्प पुरवठा झालेला नाही. आम्ही संबंधित राज्यशासनाच्या संबंधित विभागाला या विषयी लेखी कळविले आहे.

-व्ही. एस. कुलकर्णी, सहायक अधीक्षक, पोस्ट, पुणे शहर (पूर्व विभाग)

टपाल कार्यालये आणि राज्यशासन यांच्यामधील रेव्हेन्यू सवलतीचा करार ३० डिसेंबर २०२१ रोजी संपला आहे. राज्यातील टपाल कार्यालयात डिसेंबर महिन्यातील उपलब्ध रेव्हेन्यू स्टॅम्प नागरिकांना पुढील एक-दोन महिने वितरित करण्यात आले. रेव्हेन्यू स्टॅम्पचा साठा संपल्यावर नव्याने याची खरेदी शासनाकडून टपाल विभागाद्वारे करण्यात न आल्याने गेल्या एक-दोन महिन्यापासून राज्याचील टपाल कार्यालयात रेव्हेन्यू स्टॅम्प मिळणे बंद झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com