पिंपरी : उद्योगचक्र सुरू होऊनही उद्योजक हवालदिल का? काय आहे वास्तव...वाचा 

पिंपरी : उद्योगचक्र सुरू होऊनही उद्योजक हवालदिल का? काय आहे वास्तव...वाचा 

पिंपरी : उद्योग सुरू करायचा म्हटलं, तर आताच्या घडीला हातात खेळतं भांडवल नाही...जानेवारी महिन्यात केलेल्या कामाचे पैसे अजून मिळालेले नाहीत....कामगारही पगार घेऊन निघून गेलेत...बॅंकांकडून कर्ज काढायचे म्हटलं, तर त्याचे हप्ते भरता येतील का, महिन्याला तेवढ्या ऑर्डर मिळतील का, त्यामुळे काम सुरू करायचे कसे, अशा चिंतेच्या गर्तेत उद्योगनगरीतले दोन ते अडीच हजार उद्योग अडकल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी उद्योगचक्र सुरू झाले असले, तरी त्याची घडी बसायला अजून वर्षाचा कालावधी जाईल. त्यानंतरची परिस्थिती काय असेल, याचे उत्तर तूर्तात कोणाकडेच नाही. त्यामुळे आतापर्यंत उद्योग सुरू न केलेले उद्योजक हवालदिल झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे त्याचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला होता. लॉकडाउन-4 जाहीर होण्याअगोदर शहरातील उद्योगांना काही अटी आणि शर्ती टाकून काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांमध्ये शहराचे नाव रेडझोनमधून वगळण्यात आले आणि उद्योगांना पूर्ण मनुष्यबळ वापरून काम करण्याची परवानगी देण्यात आली. आतापर्यंत शहरात प्रत्यक्षात साडेनऊ ते दहा हजार उद्योगांनी उत्पादन निर्मितीस सुरुवात केली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या आहेत समस्या ? 

आतापर्यंत उद्योग सुरू करू न शकलेल्या दोन ते अडीच हजार उद्योगांपैकी सुमारे सोळाशे ते सतराशे उद्योगांकडे भांडवलांची मोठी समस्या आहे. पूर्वी काम सुरू असताना केलेल्या कामाचे पैसे वेळेत यायचे. त्यामुळे उत्पादन नियमितपणे सुरू असायचे. आताची परिस्थिती वेगळी आहे. जुन्या कामाचे पैसे मिळत नाहीत. पैशासाठी संबधितांना फोन केला, तर आमची देखील आर्थिक अडचण असल्याचे सांगत आहेत. उद्योग सुरू करण्यासाठी बॅंकेतून कर्ज काढायचे म्हटले, तर त्याचे हप्ते भरता येतील का, याचा विचार सतावतो. त्यामुळे कर्ज घेण्यासाठीही पाऊल उचलणे कठीण झाले आहे. कारखान्यात काम करणारे परप्रांतीय कामगार त्यांच्या गावाला निघून गेले आहेत. त्यामुळे कामगार देखील नाहीत, अशा अनेक समस्या या उद्योजकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. 

अडचणींबाबत चर्चा सुरु... 

उद्योगनगरीमधील उत्पादन प्रकल्प सुरु झाले असले तरी मनुष्यबळापासून ते अन्य प्रकारच्या अडचणींचा त्यांना सामना करावा लागत आहे. त्यांच्या प्रश्‍नाबाबत काय मार्ग काढता येईल, यासंदर्भात उद्योगांसाठी काम करणाऱ्या संघटना, उद्योजक यांच्याशी सातत्याने चर्चा सुरु असल्याचे उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी सांगितले. 

  • शहरातील उद्योगांची संख्या - सुमारे 12 हजार 
  • सध्या सुरु असणारे उद्योग - सुमारे साडेनऊ ते दहा हजार 
  • बंद असणाऱ्या उद्योगांची संख्या - दोन ते अडीच हजार 
  • सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या - 70 हजार ते एक लाख 

उद्योग सुरू करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आपण लवकरच उत्पादन सुरू करू शकू, असा विश्‍वास होता. मात्र, परवानगी काढल्यानंतर कामाला असणारे कामगार गावी निघून गेले. जानेवारी महिन्यामध्ये केलेल्या कामाची दोन ते तीन कंपन्यांकडे असणारी थकित रक्‍कम पाठपुरावा करूनही हातात पडली नाही. त्यामुळे हातात भांडवलही नाही आणि कामगारही नाहीत. अशामध्ये काम सुरू करणे अशक्‍य झाल आहे. त्यामुळे तूर्तात उद्योग बंदच ठेवला आहे. 
- प्रकाश ढमाले, उद्योजक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com