वरसोली टोलनाक्यावर स्थानिकांना हवी स्वतंत्र मार्गिका!

वरसोली टोलनाक्यावर स्थानिकांना हवी स्वतंत्र मार्गिका!

लोणावळा (पुणे) : महामार्गावरील वरसोली टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावी, यासाठी स्वतंत्र मार्गिकेची गरज असून मावळवासीय अद्याप संभ्रमावस्थेत आहेत. पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर स्थानिक मावळवासियांना टोलमाफी देण्यासाठी तळेगावमधील सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र आल्यानंतर मावळवासीयांना टोलमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र, टोलनाक्यांतून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व झटपट होण्यासाठी वाहनचालकांना फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या रस्त्यावरील टोलप्लाझांवर याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. स्थानिकांना यातून सूट मिळावी यासाठी वारंवार मागणी करण्यात आली. मात्र, वरसोली टोलनाक्यावर स्थानिक वाहनांसाठी स्वतंत्र कॅश लेन नसल्याने काही वेळा स्थानिक वाहनांना टोलचा भुर्दंड पडत असल्याची नागरिकांनी तक्रार केली आहे. व्यावसायिक वाहने वगळता स्थानिक छोट्या हलक्या वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली असल्याची माहिती वरसोली टोलनाका व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली. मात्र, काही वेळा वेळ लागत असल्याने स्वतंत्र मार्गिकेची गरज व्यक्त होत आहे. राज ठाकरे टोलमाफीसाठी त्यांच्या दारात गेले, असा आरोप सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र, सत्ता नसतानाही सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी राज ठाकरे यांनी टोलमाफी प्रयत्न केले, अशी प्रतिक्रिया ‘मनविसे’चे तालुकाध्यक्ष अशोक कुटे यांनी दिली. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

द्रुतगतीवरुन येणाऱ्या वाहनांना सूट मिळावी

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरुन टोल भरून येणाऱ्या वाहनांना राष्टीय महामार्गावर टोलमधून सूट द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. लोणावळा, कार्ला परिसरात वास्तव्यास असलेले विशेषतः मुंबईहून येणारे नागरिक, भाविक हे द्रुतगती मार्गावरुन प्रवास करतात. मात्र, द्रुतगती मार्गावरुन राष्ट्रीय महामार्गावर उतरल्यानंतर लगेचच वरसोली टोलनाका आहे. त्यामुळे द्रुतगतीवरील टोलबरोबरच टोलचाही नागरिकांना भुर्दंड बसतो. द्रुतगतीवर टोल भरलेल्या वाहनांना वरसोली टोलनाक्यावर सूट द्यावी, अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली  मात्र, त्यास यश मिळालेले नाही, अशी माहिती आश्विन जाधव यांनी यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टोलनाक्यावर सुविधांची गरज

सरकारने टोलवसुली धडाक्यात सुरू केली आहे. मात्र, टोलनाक्यावर टोल भरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकास मूलभूत सुविधा मिळाव्यात इतकी माफक अपेक्षा असते. उच्चदर्जाचे रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहाची सुविधा, रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणा, टोईंगची सुविधा पुरविण्याची जबाबदारी टोल व्यवस्थापनावर आहे. वरसोली टोलनाक्यावर सुविधांचा अभाव दिसून येतो.

फास्टॅग यंत्रणेमुळे वाहतुकदारांच्या वेळेची बचत होणार आहे. वाहतूकदार, टोल नाकाचालक आणि सरकारला फायदा होईल. मात्र, सर्वसामान्य स्थानिक नागरिकांना याचा भुर्दंड नको
- संतोष केदारी, रहिवासी, बोरज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com