उन्हाळ्यामुळे विजेचा वापर वाढला आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकारही घडत आहेत. मात्र, त्याचा थेट परिणाम पाणी पुरवठ्यावर होत आहे.
उन्हाळ्यामुळे विजेचा वापर वाढला आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकारही घडत आहेत. मात्र, त्याचा थेट परिणाम पाणी पुरवठ्यावर होत आहे. Sakal

खंडित वीजपुरवठ्याचा पाणीपुरवठ्याला ‘शॉक’

उन्हाळ्यामुळे विजेचा वापर वाढला आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकारही घडत आहेत. मात्र, त्याचा थेट परिणाम पाणी पुरवठ्यावर होत आहे.

पिंपरी : उन्हाळ्यामुळे विजेचा वापर वाढला आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकारही घडत आहेत. मात्र, त्याचा थेट परिणाम पाणी पुरवठ्यावर होत आहे. रविवारीही (ता. १७) अनेक भागात पुरेसे पाणी मिळू शकले नाही. काही भागात नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच तास उशिरा पाणी मिळाले. कारण, महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राचा सुमारे आठ ते दहा सात आणि निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील वीजपुरवठा एक सात खंडित झाला होता.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका पवना नदीवरील रावेत बंधारा येथून अशुद्ध जलउपसा करते. त्यासाठी वीस पंप असून तेथून पाणी पाइपद्वारे निगडी-प्राधिकरण सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते.

तेथून शहरात वितरित केले जाते. रावेत बंधारा ते निगडी जलशुद्धीकरण केंद्र यातील अंतर सुमारे सहा किलोमीटर आहे. दोन्ही ठिकाणी स्वतंत्र वीजपुरवठा आहे. त्यामुळे एका ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला तरीही पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. त्याचा परिणाम थेट नागरिकांच्या जीवनमानावर होतो. कारण, सध्या दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून विभागानुसार त्याचे वेळापत्रक तयार केलेले आहे. त्यात रात्री, उत्तररात्रीच्या वेळासुद्धा आहेत. त्यामुळे रात्री जागून नागरिकांना पाणी भरून ठेवावे लागते. अशा वेळी पाणी न आल्यास जागरणही होते आणि पाणी मात्र मिळत नाही, असा प्रसंग ओढवतो व नागरिकांचे हाल होतात. अशाच प्रसंगाला शनिवारी मध्यरात्रीनंतर अर्थात रविवारी पहाटे नागरिकांनी जागरण केले. मात्र, त्यांना पाणी मिळालेच नाही. चौकशीनंतर कळाले, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी येणार नाही.

नेमके काय घडले....
निगडी-प्राधिकरण सेक्टर २३ येथील वीजपुरवठा शनिवारी (ता. १६) रात्री २३.३५ वाजेपासून रविवारी (ता. १७) रात्री (पहाटे) २.१५ वाजेपर्यंत महावितरणकडून खंडित झाला होता. त्यामुळे तेथील संप लेव्हल ५.५० मीटर झाल्याने रावेतचे काही पंप बंद करण्यात आले होते. सेक्टर २३ येथे संप लेवल कमी असल्याने रात्री २.१५ पासून तीन ऐवजी एकच पंप एस-टु संपसाठी चालू आहे. याचा परिणाम प्रभाग ११ चा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. तसेच रविवारी (ता. १७) पहाटे तीन वाजता चालू करावयाचे यमुनानगर व साईनाथनगरचे पाणी सकाळी ७.३० वाजता चालू होण्याची शक्यता आहे, तसेच मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणेवस्ती येथे सकाळी ७.३० वाजता सुरू करावयाचे पाणी सकाळी ११ वाजता चालू होण्याची शक्यता आहे. याची संबंधित नागरिकांनी नोंद घेऊन, सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले होते. मात्र, रविवारी (ता. १७) दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झालेला नव्हता, असे माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी सांगितले.

वीजपुरवठा खंडित झाल्याने शनिवारी रात्री सुमारे तीन तास पंपिंग स्टेशन बंद होते. त्यामुळे काही भागात रविवारी पहाटे व सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. गेल्या दीड महिन्यात तीन-चार वेळा अशा विजेअभावी पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला.
- श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता, महापालिका

रावेत पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा करण्यासाठीचे चार कंडक्टर तुटले होते. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याच्या दुरुस्तीसाठी आठ ते दहा तास लागले. निगडी जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा रात्रीच पुर्ववत केला होता.
- उदय भोसले, कार्यकारी अभियंता, महावितरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com