‘शौर्यगाथा हैदराबाद लढ्याची’ 
देशभक्तिपर कार्यक्रम उत्साहात

‘शौर्यगाथा हैदराबाद लढ्याची’ देशभक्तिपर कार्यक्रम उत्साहात

पिंपळे गुरव, ता. २९ ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने ‘शौर्यगाथा हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याची’ या देशभक्तिपर कार्यक्रमाचे पिंपळे गुरव येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्‍घाटन श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थान सांगवीचे अध्यक्ष बब्रुवान वाघ महाराज यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला २५१ पुस्तके अर्पण करून करण्यात आले.
यावेळी उद्योजक विवेक भोसले, बाबूराव तांदळे महाराज, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे, सद्गुरुसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन म्हसे, दिलीपराव बारडकर, प्रीती काळे, शारदा मुंडे, सोमनाथ शेटे, शिवकुमारसिंह बायस, रवी पाटील, सतीश काळे, किशोर पाटील, सूर्यकांत कुरुलकर, दत्तात्रेय धोंडगे, बळीराम कातंगळे, किसन फसके, अनुराग दुधभाते, किशोर आटरगेकर, सोशल मिडीया प्रमुख प्रा. डॉ. प्रविण घटे, अमोल लोंढे, अभिनेते पृथ्वीराज थोरात, अभिनेत्री कालिंदी नेस्ताने, कलावंत इंद्रभान करे, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघ व भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आदी उपस्थित होते.
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘७५ रिक्षा मराठवाडा मुक्तिसंग्राम फिरते वाचनालय’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या रिक्षासाठी जनार्दन सोनवणे यांनी ७५ पुस्तकांचा संच भेट देऊन शुभारंभ केला. पिंपरी-चिंचवड, पुणे, मुंबई येथे राहणाऱ्यांना मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा जाज्वल्य इतिहास कळावा, ही या मागची भूमिका आहे. 
यावेळी बोलताना विवेक भोसले यांनी अपरिचित हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास, त्यांचे कार्य याची माहिती दिली. क्रांतिवीर दत्तोबा भोसले, कन्नडचा वाघ देशमुख, क्रांतिवीर माणिकचंद पहाडे, जामगावचे विठ्ठलराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, बारा बलुतेदार स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती दिली. 
सचिन म्हसे यांनी सांगितले की, येत्या वर्षभरात संपूर्ण मराठवाड्यात ७५० मराठवाडा मुक्तिसंग्राम वाचनालय चालू करण्याचा संकल्प केला आहे.   
प्रास्ताविक करताना अरुण पवार यांनी सांगितले की, मराठवाड्यात वर्षभरात ७५ हजार वृक्ष लागवड, संवर्धन आणि ७५ हजार पुस्तकांचे वाटप हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. बाबूराव तांदळे महाराज यांनी सांगितले की, अरुण पवार व नितीन चिलवंत हे मराठवाड्याच्या विकासासाठी करीत असलेले कार्य उत्कृष्ट आहे. त्यांच्या पाठीमागे उभे राहणे, हे मराठवाडा भूमिपुत्रांचे कर्तव्य आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चिलवंत यांनी, तर आभार सूर्यकांत कुरुलकर यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com