Fri, May 20, 2022

कचराकुंड्या हटविल्याने गैरसोय
कचराकुंड्या हटविल्याने गैरसोय
Published on : 7 May 2022, 1:54 am
ठिकठिकाणी असलेल्या कचराकुंड्या स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत काढून टाकल्या आहेत. त्यामुळे कासारवाडी, भोसरी, चिंचवड, निगडी व आकुर्डी प्राधिकरण, रावेत या भागात रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात आहे. नोकरदार महिला व पुरुष वर्ग सकाळीच घराबाहेर पडत असल्याने घंटागाडीमध्ये कचरा टाकता येत नाही. आठ दिवसांचा कचरा घरात साठून दुर्गंधी पसरत आहे. काही सोसायट्या व घरांमध्ये अद्यापही कचरा उचलण्याची सोय नाही. परिणामी, काही नागरिक रस्त्यावरच आडबाजूला कचरा फेकत आहेत. त्यामुळे शहर विद्रूपीकरणात अधिकच भर पडत आहे. त्यामुळे, कचरा कुंड्यांची व्यवस्था पूर्ववत करावी.
- दुर्गा अष्टेकर, कासारवाडी
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61200 Txt Pc Today
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..