
माणुसकीच्या धर्माचा आपल्याला विसर
पिंपरी, ता. ९ ः ‘‘धर्मात राजकारण असावे की नाही, असा अनेकांना प्रश्न पडतो. परंतु मुळात धर्म आपल्याला कळतो का, हा खरा प्रश्न आहे. खऱ्या माणुसकीच्या धर्माचा आपल्याला विसर पडत चालला आहे. ती दुसऱ्या कोणाचीतरी जबाबदारी आहे, असे आपल्याला वाटते’’, असे मत माध्यम विश्लेषक सुशील कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
चिंचवडगावातील गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘धर्म आणि राजकारण’ असा त्यांचा विषयाची त्यांनी मांडणी केली. अध्यक्षस्थानी प्रा. सुनील खर्डे होते. चापेकर स्मारकामध्ये व्याख्यानमाला सुरू आहे.
कुलकर्णी म्हणाले, ‘‘धर्मात राजकारण असावे की नाही? असा अनेकांना प्रश्न पडतो. परंतु मुळात धर्म आपल्याला कळतो का? हा खरा प्रश्न आहे. राजकारणात धर्माचा विषय आला की बाब संवेदनशील बनते. वास्तविक राज्यघटनेनुसार राजकारण चालणे अपेक्षित आहे. संवैधानिक पद स्वीकारताना मी राजधर्म निभावेल अशी शपथ घेऊनही तसे आचरण केले जाते का? आपल्या देशात पूर्वी राजसत्ता अस्तित्वात असताना राज्यकारभाराचा धर्म ठरलेला असे आणि धर्मगुरू किंवा कुलगुरू त्यांवर अंकुश ठेवण्याचे काम करत. आपल्या देशात संविधानाप्रमाणे वागणे अपेक्षित आहे.’’
जगदीश घुले यांनी प्रास्ताविक केले. विजय बोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. रोहन जाधव यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61546 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..