
धरणातील गाळ काढणे हाच जालीम उपाय
देशात तीन ते चार महिने पाऊस पडतो. त्यापूर्वीच बहुतांश ठिकाणी पाणी टंचाई असते. जून, जूलैमध्येच धरणे ओसंडून वाहतात. अब्जावधी टीएमसी क्षमतेचे पाणी विसर्ग म्हणून सोडून दिले जाते. कारण सर्व धरणे अर्ध्यापेक्षा जास्त गाळानेच भरलेली आहेत. पाणी विसर्ग केल्यास नदीकाठच्या रहिवाशांना गाव सोडून पळावे लागते. शेती ओसाड होते. जीवितहानी, आर्थिक फटका बसतो. प्रचंड नुकसान होते. हे बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. याला कारण म्हणजे कित्येक वर्षात धरणातील गाळ काढलेला नाही. नवीन सुधारित मशिनने गाळ काढल्यास खोली वाढेल. पाणी साठवणूक क्षमता वाढते, गाळ खतपाणी शेतकऱ्यांना उपयोग होतो. सर्व प्रकारच्या नुकसान भरपाई पासून सुटका होईल. हा अपव्यय टाळण्यासाठी एकमेव जालीम उपाय म्हणजे प्रायोगिक तत्त्वावर राज्य शासनाने युद्ध पातळीवर नक्कीच करून पाहावा. निसर्ग पाऊस देतो, पण आपण पाणी न वापरता समुद्रात जावू देतो. नवीन धरण बांधणे प्रचंड खर्चिक असून शेतजमीन मिळत नाही. याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा.
रमेश पाटील
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29492 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..