
शहराच्या विकासासाठी जनसंवाद सभा महत्त्वाच्या महापालिका प्रशासक पाटील यांचे मत
पिंपरी, ता. २० ः महापालिकेच्या जनसंवाद सभांमध्ये आतापर्यंत एक हजार ६३३ नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे. शहर विकासासाठी या सभांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे, अशी माहिती प्रशासक राजेश पाटील यांनी दिली.
नागरिक व प्रशासनाच सुसंवाद राखणे व तक्रारींच्या जलद निवारणासाठी पाटील यांनी जनसंवाद सभा उपक्रम सुरू केला. प्रशासकीय यंत्रणा अधिक गतिमान व सक्षमपणे राबवण्यासाठी, तसेच विविध महत्त्वपूर्ण सूचनांचा अंतर्भाव प्रशासकीय कामकाजात करून घेण्यासाठी जनसंवाद सभा प्रभावी माध्यम ठरले आहे. सोमवारच्या (ता. २०) सभेत ७९ नागरिकांनी सहभाग घेऊन सूचना मांडल्या. अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे १५, ६, ५, ५, ९, ४, २५ आणि १० नागरिकांनी आपले म्हणणे मांडले. यामध्ये उच्च दाबाने व सुरळीत पाणीपुरवठा करणे, आवश्यक ठिकाणी सांडवाहिन्या टाकणे, स्वच्छता मोहीम राबविणे अशा सूचनांचा समावेश होता. त्यावर धोरणात्मक निश्चितीकरीता कार्यवाही सुरू केली असल्याचेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ उपस्थित होते. अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभांच्या अध्यक्षपदी अनुक्रमे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम, सहायक आयुक्त प्रशांत जोशी, उपायुक्त अजय चारठाणकर, सहशहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी होते.
--------------------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m81997 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..