Mon, June 27, 2022

कासारसाई धरणात
चाळीस टक्के साठा
कासारसाई धरणात चाळीस टक्के साठा
Published on : 26 May 2022, 2:09 am
सोमाटणे, ता. २६ ः कासारसाई धरणात चाळीस टक्के तर आढले, पुसाणे धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. कासारसाई धरणाच्या पाण्याचा अधिक वापर शेतीसाठी केला जातो. त्यामुळे पाणी टंचाई होऊ नये, यासाठी पाटबंधारे विभागाने सुरवातीपासून धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन केल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय टळला. त्यामुळे उसासाठी भरपूर पाणी वापरुनही धरणात सध्या मुबलक पाणी साठा शिल्लक राहिला आहे. सध्या धरणात उपयुक्त पाणीसाठा ६.४४ दशलक्ष घनमीटर तर एकूण पाणीसाठा ७. ६२ दशलक्ष घनमीटर आहे. धरणात चाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतीसाठी आवश्यकतेप्रमाणे भरपूर पाणी उपलब्ध झाले आहे. पुसाणे, आढले धरणातील उपयुक्त
पाणी पातळी शून्याच्या जवळ गेली आहे.
---------------------------------------------------------------------------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r06616 Txt Pc Today
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..