आंद्रा धरणाचे पाणी
पुढील पंधरा दिवसांत

आंद्रा धरणाचे पाणी पुढील पंधरा दिवसांत

पिंपरी, ता. २० ः आंद्रा धरणातून मिळणारे शंभर दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी मार्च अखेरपर्यंत नागरिकांना मिळेल, असे महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. त्यादृष्टिने पाणीपुरवठा विभागाने तयारी सुरू केली आहे. आंद्रा धरणातून शंभर आणि भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी शहरासाठी मिळणार आहे. त्यासाठी चिखलीत ३०० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. भामा-आसखेड प्रकल्पांतर्गत कामे सुरू आहेत. आंद्राचे पाणी इंद्रायणी नदीतून तळवडे-निघोजेपर्यंत आणले जाणार आहे. तेथील बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करून चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पात आणले जाईल. त्यानंतर चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्याची चाचणी सुरू आहे. पुढील पंधरा दिवसांत प्रकल्पाचे लोकार्पण करून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू असल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com