ओडिशातील अपघातप्रकरणी
रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी, सुरक्षा कवच योजनेवर प्रश्‍नचिन्ह

ओडिशातील अपघातप्रकरणी रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी, सुरक्षा कवच योजनेवर प्रश्‍नचिन्ह

पिंपरी, ता. ३ ः ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेस, बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्या २८० पेक्षा जास्त प्रवाशांना पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, या भीषण अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली.
मृत प्रवाशांच्या परिवाराच्या दुःखात आपण सामील असल्याचे गव्हाणे यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करत सुरक्षा कवच योजना जाहीर केली होती. २०१६ नंतरचा हा सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे. गेल्या सात वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वेच्या सुरक्षा कवच योजनेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आपली जाहिरातबाजी कमी करून, देशभरात होणाऱ्या रेल्वे तसेच रस्ते अपघातांबाबत चिंतन करण्याची गरज आहे, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.


शास्त्रीजींचा आदर्श घेतील काय?
ओडिशा येथील भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करतानाच अजित गव्हाणे यांनी माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या एका लहान अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून ताबडतोब रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या घटनेची आठवण करून दिली. भाजप नेत्यांमध्ये तेवढी नैतिकता आणि संवेदनशीलता आहे काय? असा सवालही गव्हाणे यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com