यंदाचा उत्पन्नाचा दाखला चालेना
आरटीई प्रवेश ः अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज बाद होण्याची वेळ

यंदाचा उत्पन्नाचा दाखला चालेना आरटीई प्रवेश ः अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज बाद होण्याची वेळ

पिंपरी, ता. २४ : सध्या आरटीई प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. मात्र, यावर्षी काढलेला उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जात नसल्याने पालकांची धांदल उडाली आहे. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज बाद होण्याची वेळ पालकांवर आली आहे. उत्पन्नाचा दाखल्याचा खोडा घातल्यामुळे या कायद्यानुसार खरेच गरिबांच्या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पालकांचा जीव मेटाकुटीला
शहरात ३ हजार २५० आरटीई प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी २० हजाराहून अधिक पालकांनी अर्ज केले आहेत. मात्र; यावर्षी शिक्षण विभागाने एप्रिल २०२३-२४ या वर्षाचे उत्पन्न ग्राह्य धरले जाणार नाही, अशी सूचना लागू केली आहे. त्यामुळे पालकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, ‘आरटीई’अंर्तगत शाळा प्रवेश घेताना विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असणे अपेक्षित आहे. प्रवेश घेताना यासाठी तहसीलदाराकडून मिळणारा दाखला ग्राह्य धरला जातो. बहुतांश पालकांनी मार्च ते एप्रिल २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दाखले काढले आहेत. पण; सलग तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला नसल्याने चालू आर्थिक वर्षातील एक वर्षाचा उत्पन्न ग्राह्य धरले जात नसल्याने पालकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. ही कागदपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांच्या तहसील कार्यालयात चकरा वाढल्या आहेत.

तीन वर्षांचा काढा दाखला
आरटीई प्रवेशासाठी कागदपत्रांची आवश्यकता भासत असल्याने पालकांनी त्यांची जुळवाजुळवीस सुरवात केली आहे. पण; आर्थिक उत्पन्नाचा एक वर्षाचाच दाखला ग्राह्य धरला जात नसल्याने कागदपडताळणीमध्ये लाभार्थ्‍याचे अर्ज बाद होण्याचे प्रकार समोर आले आहेत. आकुर्डी विभागात २ हजार १८४ अर्जापैकी ३२० अर्जांची तपासणी पूर्ण झालेली आहे. दरम्यान, पडताळणी समितीने ३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच इतरांच्या अर्ज तपासून प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे.

‘आरटीई’ प्रवेशासंदर्भात काही अडचणी पालकांना जाणवल्या असतील, तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. पालकांनी संपूर्ण कागदपत्रांची तपासणी करून घ्यावी.’’
- संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

आकडे बोलतात......
एकूण जागा - ३ हजार २५०
एकूण अर्जांची छाननी - १ हजार ७५०
आकुर्डी विभागातील विद्यार्थी शिफारस - ४००
पिंपरीतील विभागातील विद्यार्थी शिफारस - ३५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com