विठ्ठल दळवी यांना महाराष्ट्र सह्याद्री रत्न पुरस्कार

विठ्ठल दळवी यांना महाराष्ट्र सह्याद्री रत्न पुरस्कार

Published on

सोमाटणे, ता. २४ ः आढले येथील कर्मवीर विद्यालयातील कर्मचारी तसेच कवी, लेखक विठ्ठल दळवी यांना महाराष्ट्र सह्याद्री रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दळवी यांनी ग्रामिण भागात प्रबोधन घडवण्यासाठी संतांची शिकवण आणि विद्यार्थ्याची जडणघडण, छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती, संत विचारातून देशाची प्रगती, संत साहित्याचे शालेय अभ्यासक्रमातील महत्त्व आदींसह विविध विषयांवर लेखन तसेच कविता करून त्याचा प्रसार, प्रचार केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत पालघर येथील न्यू इंडिया सोशल ट्रस्ट यांच्या वतीने महाराष्ट्र सह्याद्री रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. यापूर्वी दळवी यांना विविध सामाजिक संस्थांच्या वतीने एकूण एकतीस पुरस्कार देण्यात आले असून हा त्यांचा बत्तीसावा पुरस्कार आहे. आढले गावचे सरपंच अनंता घोटकुले, सदाभाऊ घोटकुले, रवी घोटकुले, नारायण घोटकुले, महादू घोटकुले, सहादू वाघमारे, गबळू वाघमारे आदींसह ग्रामस्थांच्या वतीने दळवी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com