
मावळातील शेतकऱ्यांना मिळणार एक कोटी ६० लाख
पवनानगर, ता. १० : मावळ तालुक्यातील विठू माऊली सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण राक्षे यांच्या अपार प्रयत्नातून मावळातील शेतकऱ्यांना एक कोटी साठ लाख रुपये मिळणार आहे.
पवन मावळातील तीस ते पस्तीस गावांमध्ये व अनेक वाड्या वस्त्यांमध्ये विठू माऊली सोशल फाउंडेशन व त्याची पूर्ण टीमने चाळीस दिवस गावात जाऊन पंतप्रधान किसान योजनांतर्गत ईकेवायसीचे फॉर्म शेतकऱ्यांना मोफत नोंद करून दिली. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये अशाप्रकारे वर्षाला सहा हजार रुपये दिले जातील. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम देखील जमा झाली आहे. तसेच त्यांनी आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजना, वृद्ध नागरिकांना पेन्शन योजना, ई-श्रम कार्ड अशा अनेक प्रकारच्या योजनेचे लाभ घेऊन दिले आहे. तसेच महिलांनी आपले स्वतःचे सौरक्षन स्वतःच करावे, त्यासाठी प्रशिक्षण घेण्यात आले होते.
पवन मावळमध्ये प्रत्येक वाडी-वस्तीमध्ये प्रत्येक घरात वैयक्तिक संपर्क करून माझ्या शेतकरी बांधवांना महिलांना व तरुणांना, वृद्धांना प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ पोहोचावा. सर्वसामान्य हेतूच ध्येय बनून मी अनेक वर्ष कार्यरत राहणार आहे.
- किरण राक्षे, संस्थापक, विठू माऊली सोशल फाउंडेशन
Web Title: Todays Latest Marathi News Pvn22b00653 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..