तीन वारकऱ्यांना
उपचारानंतर सोडले

तीन वारकऱ्यांना उपचारानंतर सोडले

Published on

तळेगाव दाभाडे, ता. १२ ः कामशेत परिसरात मंगळवारी सकाळी कार्तिकी वारीच्या दिंडीत कंटेनर घुसून जखमी झालेल्या वारकऱ्यांपैकी तिघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. उर्वरित सात वारकऱ्यांची प्रकृती सुधारत आहे, अशी माहिती डॉ. विकेश मुथा यांनी दिली. या दुर्घटनेत एका महिला वारकऱ्याचा मृत्यू झाला होता. जखमींपैकी दत्तात्रय विष्णू घरत, शारदा ठाकूर आणि प्रभाकर तांडेल यांना घरी सोडण्यात आले. कंटेनर चालक चंद्रशेखर रमाकांत सिंग (वय २४) याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्याला १४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली. याप्रकरणी कामशेत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बालाजी लोसरवार तपास करत आहेत.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com