
जांभूळ रेल्वे भुयारी मार्गाचे काम सुरू करण्याची मागणी
वडगाव मावळ, ता. ९ : जांभूळ येथील रेल्वे भुयारी मार्गाचे काम बंद असून, ते लवकरात लवकर सुरू करावे व पावसाळ्यात तेथे पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी जांभुळचे सरपंच नागसेन ओव्हाळ व उपसरपंच एकनाथ गाडे यांनी मध्यरेल्वेच्या विभागीय कार्यालयाकडे केली आहे.
रेल्वेच्या गेट क्रमांक ४७ मधून जांभूळ व आंदर मावळातील चाळीस गावांची रहदारी आहे. ग्रामस्थांच्या सोयीसाठी रेल्वेच्या वतीने या ठिकाणी मार्च महिन्यापासून भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. महिनाभर काम चालू राहिले. मात्र, एप्रिलपासून हे काम बंद आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे. या रस्त्याने अनेक विद्यार्थी, कामगार, दुग्ध व्यावसायिक, बाजारहाट करण्यासाठी तालुक्याच्या गावी जाणारे ग्रामस्थ या सर्वांची अडचण होणार आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे व पावसाळ्यात तेथे पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्यावी अशी मागणी ओव्हाळ व गाडे यांनी केली आहे. या बाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02386 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..