आमदार जगताप यांच्याकडून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण

आमदार जगताप यांच्याकडून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण

Published on

वाकड, ता.२० : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने ‘आमदार आपल्या दारी’ या जनसंपर्क उपक्रमांतर्गत वाकड परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमात ४८५ नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या. त्यावर जगताप यांनी जागेवरच निर्णय घेत अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
तहसीलदार जयराज देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, संदीप कस्पटे, आरती चोंधे, विनायक गायकवाड, संतोष कलाटे, संकेत चोंधे, प्रा. भारती विनोदे, विशाल कलाटे, राम वाकडकर, सचिन साठे, कुणाल वाव्हळकर, राहुल काटे, नितीन इंगवले, स्नेहा कलाटे, श्रीनिवास कलाटे, गणेश कस्पटे, अमोल कलाटे, रामदास कस्पटे, रणजित कलाटे, नवनाथ ढवळे, चेतन भुजबळ, नंदू बालवडकर, जालिंदर काटे, सुदेश राजे आदी उपस्थित होते.
महामार्ग सेवा रस्त्यांचे काँक्रिटीकरण, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, नदी-नाल्यांचे प्रवाह सुरळीत करणे, अतिक्रमणमुक्त पदपथ आदींवर चर्चा झाली. विजेच्या केबल बदलणे, पोलिस गस्त वाढविणे, वाकडकर वस्ती ते भुजबळ वस्ती रस्ता रुंदीकरण आदींबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. भुयारी मार्गाजवळील कोंडी मुक्तीसाठी ‘पुश बॅक’ तंत्राद्वारे काम सुरू करण्याची तसेच वाकड, पिंपळे निलख दफनभूमी आरक्षण रद्द करण्याची हमी दिली.

नागरिकांच्या दारापर्यंत सेवा पोहोचवणे, थेट संवादातून त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि समस्यांचे त्वरित निराकरण करणे हेच आमचे ध्येय आहे. वाहतूक, वीज, पाणी, सार्वजनिक आरक्षणे यासारख्या विविध विषयांवर ठोस निर्णय घेतले आहेत. शासकीय यंत्रणांतील समन्वयाच्या जोरावर वाकड-पुनावळे परिसराचा सर्वांगीण विकास होईल.
- शंकर जगताप, आमदार चिंचवड

WKD25A09066, WKD25A09067

Marathi News Esakal
www.esakal.com