शिवसेना नेते संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील वाद आता रंगात आला आहे. संजय राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांवर पलटवार केला. त्यांनी सोमय्यांकडे अनेक प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. तसेच त्यांच्यावर आरोपही केले आहेत.
आयएनएस विक्रांत ही देशाची शान आहे. तिचे जतन व्हावे यासाठी किरीट सोमय्या यांनी लोकसहभागातून निधी गोळा केला होता; मात्र तो निधी शासनाकडे पोहोचलाच नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले. १० दिवस पैसे गोळा करत होतात ना ! मग जमा झालेल्या ५८ कोटींचे काय केले, असा प्रश्न राऊत यांनी सोमय्यांना विचारला आहे.
राऊत यांनी सोमय्यांना चोर म्हटले आहे. हा चोर आहे. याची अजून दहा प्रकरणे मी बाहेर काढेन, असे म्हणत केंद्रीय तपास यंत्रणा आता गप्प का, असा प्रश्न तयांनी उपस्थित केला आहे. आज तो चोर दिल्लीत पळाला याचे कारण स्वाभाविक आहे. तो दिल्लीत जातो कारण त्याचे मनसुबे वेगळे आहेत. मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव आहे. मराठी माणसांना संपवण्याचा विचार सुरू आहे. हा चोर महाराष्ट्रद्रोही आहे, असे आरोप राऊत यांनी केले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.