प्रीमियम महाराष्ट्र
आषाढी वारी : यंदा वारकरी विक्रमी संख्येने सहभागी होण्याची शक्यता
वारकरी संप्रदायाने या काळात संयमी भूमिका दाखविली
कोरोना काळात वारकऱ्यांनी जो संयम दाखविला, तो आदर्शवतच आहे. लाखो भाविकांचा सहभाग असलेली आषाढी वारी दोन महिन्यांवर आली आहे. यंदा वारी होणार असल्याचा आनंद वारकऱ्यांमध्ये निश्चित आहे. त्यामुळे यंदाची वारी विक्रमी भरेल, यात शंका नाही. मात्र, या वारीचे नियोजन करण्याचे काम सरकारच्या तसेच वारकऱ्यांच्या पातळीवर सुरू झाले आहे. आषाढी (Aashadhi Wari) वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवरील बंधने पाळावी लागणार आहे. प्रशासना समोरही मोठे आव्हान आहे. मात्र, वारकरी संप्रदाय हा शिस्तप्रिय आहे. त्यामुळे वारकरी निश्चित संयम ठेऊन आरोग्याबाबतची बंंधने पाळून वारी सुखकर करतील, अशी आशा आहे.