खडकवासलात 72 टक्के पाणीसाठा; आज नदीत पाणी सोडावे लागणार 

खडकवासलात 72 टक्के पाणीसाठा; आज नदीत पाणी सोडावे लागणार 

खडकवासला -  शहरालगतच्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली. सोमवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाने खडकवासला धरणात रात्री 10 वाजता 1.42 टीएमसी म्हणजे 72 टक्के पाणीसाठा झाला, तो मंगळवारी 100 टक्के होण्याची शक्‍यता आहे. खडकवासला धरणाची क्षमता 1.97 टीएमसी एवढी आहे. एवढा पाणीसाठा झाला, की धरण शंभर टक्के भरते. त्यानंतर मुठा नदीत पाणी सोडणार आहे, असे पाटबंधारे विभागाने "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून सोमवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला येथे 103, पानशेत येथे 311, वरसगाव 317 व टेमघर येथे 500 मिलिमीटर पाऊस झाला. शनिवारी चारही धरणांत 4.63 टीएमसी पाणीसाठा होता. सोमवारी तो आठ टीएमसी झाला. या अडीच दिवसांत धरणातून शहराला सोडलेले पाणी गृहीत धरून सुमारे चार टीएमसीने पाणी वाढले आहे. 

खडकवासला धरणातून पाणी सोडावे लागत आहे. इतर तिन्ही धरणे निम्मीदेखील भरलेली नाहीत. खडकवासला धरण भरल्यामुळे या धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. त्या वेळी येवा असेल तेवढे पाणी मुठा नदीत सोडावे लागणार आहे. पानशेत 3.67 टीएमसी म्हणजे 34.43 टक्के, वरसगावमध्ये 2.88 टीएमसी म्हणजे 22.51 टक्के, टेमघर धरणात 0.31 टीएमसी म्हणजे 8.29 टीएमसी जमा झाले आहे. चारही धरणांत मिळून 8.07 टीएमसी म्हणजे 27.30 टक्के पाणी जमा झाले आहे. 

पाच महिन्यांचे पाणी जमा 
धरण साखळी क्षेत्रातील पाणीसाठा आठ टीएमसी झाला आहे. दर महिन्याला शहराला सुमारे दीड टीएमसी पाण्याची आवश्‍यकता असते. यानुसार हे आठ टीएमसी पाणी पाच महिने पुरेल एवढे आहे. शहराची पुढील पाच महिन्यांसाठीची पाण्याची गरज पूर्ण झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com