पुणे - ‘अभिनय म्हणजे आभास निर्मितीची कला असून, अभिनय एवढा खोटा करायचा की तो खरा वाटला पाहिजे. रंगमंच असो वा चित्रपट स्वतःला झोकून देऊन काम करणे म्हत्वाचे आहे,’’ असे मत अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.
विक्रम गोखले ॲक्टिंग ॲकॅडमीतर्फे अभिनय कार्यशाळेबाबत चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी गोखले, अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेते गिरीश परदेशी, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले व एच. आर. झूम फिल्मचे राजाराम कोरे उपस्थित होते.
उसगावकर म्हणाल्या, ‘‘एक उत्तम अभिनेत्री बनायचे असेल, तर मुळात त्या व्यक्तीमध्ये उपजत काही गुण असणे आवश्यक असते. महिलांसाठी चित्रपटसृष्टीत वातावरण अनुकूल असून सुरक्षित आहे.’’ परदेशी म्हणाले, ‘‘व्यावसायिक अभिनेता बनण्यासाठी गोखले यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले. अभिनयाबरोबरच ते उत्तम माणूस असून, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ आहेत.’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.