बारामती शहर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार ,आशाताई पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार या सर्वांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज (सोमवार) सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीमध्ये या राज्यात परिवर्तन होईल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभांना राज्यांमध्ये जो उदंड प्रतिसाद मिळाला विशेषतः तरुणाई शरद पवार यांच्या पाठीशी होती, हे पाहून राज्यात एक वेगळेच चित्र निर्माण होईल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचे वातावरण आहे त्याचा परिणाम मतदानावर होणार नाही, लोक उत्साहाने घराबाहेर पडून मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्या वादावर बोलताना वास्तविक अशा प्रकारचा वाद होणे अपेक्षित नाही, ही कौटुंबिक घटना आहे. निवडणूका येतात जातात मात्र परस्परांमध्ये समन्वय राखणे गरजेचे आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले. राजकारणात निवडणुकीच्या अगोदर अशा घटना घडतात, धनंजय मुंडे यांच्याशी बोलल्यानंतर आपण कुणाचे मन दुखावेल असे वक्तव्य केलेले नव्हते, असे अजित पवार यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.