1kidnap_0.jpg
1kidnap_0.jpg

पैशांच्या वादातून व्यवसायिकाचे अपहरण करणाऱ्यांना अटक

पुणे : पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून बालेवाडीमधील एका व्यवसायिकाचे टोळक्‍याने अपहरण करुन काही वेळाने सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. 

याप्रकरणी माथी वेंकटरत्नम दिनकर (वय 40, रा. मिरॅकल ग्लोरी, बालेवाडी) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन सुरेश संतोष सणस, उत्तम राजाराम चोरगे, रोहित पंढरीनाथ चोरघे, संताजी तानाजी भोसले, अक्षय तुकाराम धरपाळे, तेजस रवींद्र लिम्हण यांना अटक केली आहे. तर याबरोबरच त्यांचे साथीदार मुकेश आसवले, मनोज कसबेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिनकर यांनी आरोपींकडून घेतलेले पैसे त्यांना परत केले नव्हते. दोन दिवसांपूर्वी दिनकर हे बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्‍लब रस्त्यावरील एका सोसायटीमध्ये आले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी त्यांना जबरदस्तीने गाडीमध्ये बसविले. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करीत त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधली व काही किलोमीटर दुर नेऊन त्यांना सोडून दिले. आरोपी भारती विद्यापीठ परिसरात असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com