मराठीसाठी राजकीय इच्छाशक्ती मेलेली - हरी नरके 

मराठीसाठी राजकीय इच्छाशक्ती मेलेली - हरी नरके 

पुणे - ‘‘सध्याचे राज्यकर्ते भाषाप्रेमी, कलाप्रेमी असतील असे वाटले होते; पण साडेचार वर्षांत अभिजात दर्जाबाबत काहीच घडले नाही. राजकीय इच्छाशक्तीच मेलेली असल्याने ही परिस्थिती उद्‌भवली आहे. पाच वर्षांत मराठी विचित्र तावडीत सापडली आहे,’’ असे मत विचारवंत प्रा. हरी नरके यांनी व्यक्त केले. या वेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होत्या. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे नरके यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. जालना येथील संजीवनी तडेगावकर यांच्या ‘संदर्भासहित’ कवितासंग्रहाला आणि संस्कृती प्रकाशनाच्या सुनीताराजे पवार यांना (कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुरस्कृत कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार) डॉ. सचिन जोशी यांच्या ‘दुर्गसंवर्धन’ या ग्रंथाला (द. वा. पोतदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार) सांगली येथील डॉ. वि. दा. वासमकर यांच्या ‘मराठीतील कलावादी समीक्षा’ या समीक्षाग्रंथाला आणि अक्षरदीप प्रकाशनाला (रा. श्री. जोग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार), मकरंद साठे यांच्या ‘निवडक निबंध -  रंगभूमी व साहित्य’ या ग्रंथाला (शं. ना. जोशी स्मृती पुरस्कार) नामदेव गवळी यांच्या ‘भातालय’ या कवितासंग्रहाला (सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार) हरी नरके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.  

मकरंद साठे म्हणाले, ‘‘फॅसिस्ट म्हणवून घेण्यात अनेक जण धन्यता मानतात. धार्मिक हिंसा वाढत आहे. लेखकाचा हस्तक्षेप अर्थवाही असतो. मात्र, साहित्याला समाजात स्थान आहे की नाही, असा प्रश्न पडतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com