बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेव पळाला : गिरीश बापट

Girish Bapat
Girish Bapat

पुणे : शिवसेना नेते व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी खातेवाटप होण्यापूर्वीच राजीनामा देणे म्हणजे बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव पळून जाणे असे झाल्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारला पहिला धक्का बसला असून, मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या पाच दिवसांतच शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी झाल्यानंतर आज (शनिवार) पाच दिवस झाले अद्याप खातेवाटप झालेले नाही. खातेवाटपाला मुहूर्त मिळण्यापूर्वीच एका राज्यमंत्र्यांने राजीनामा दिल्याने मोठी नामुष्की ओढावली आहे. भाजप नेत्यांकडून आज (शनिवाऱ) पुण्यात काँग्रेसविरुद्ध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह प्रमुख नेते सहभागी झाले होते.

गिरीश बापट म्हणाले, की मी अशी बातमी ऐकली नाही. सरकारने अद्यापही खातेवाटप केले नाही. सत्तार यांनी का राजीनामा दिला हे माहित नाही. लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला अशी परिस्थिती उद्भवली आहे. तीन पायांच्या सरकारमध्ये काहीही होऊ शकते. सरकारमध्ये काय चलबिचल सुरू आहे हे यातून दिसते. तीन पक्षांचं सरकार आपल्या तत्त्वांशी तडजोड करून सत्तेवर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com