बालकांच्या पलायनात पुणे दुसरे

Child Care
Child Care

मुंबई - राज्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या बाल सुधारगृहातील बालके पळून जात असल्याचे धक्कादायक वास्तव लोकलेखा समितीच्या अहवालातून समोर आले आहे. पळून जाणाऱ्या बालकांच्या टक्केवारीत नागपूर पहिल्या तर पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

लोकलेखा समितीने २०१० ते २०१५ मधील राज्यभरातील बालसुधारगृहातील स्थितीचा अहवाल बुधवारी विधानसभेत सादर केला. समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांनी सभागृहात सांगितले की, समितीने एकूण परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. त्यांचाही अहवालात समावेश आहे. 

समितीने पुण्यासह नगर, लातूर, मुंबई शहर, नागपूर, परभणी, उस्मानाबाद आणि यवतमाळ या सात जिल्ह्यांतील २५ बालगृहांची तपासणी केली. त्यातील ११ हजार ६६८ बालकांपैकी ५५८ बालके पळाल्याचे उघडकीस आले. पळून गेलेल्या बालकांची टक्केवारी नागपूरला सर्वाधिक म्हणजे ४७ टक्के तर पुण्यातून ३३ टक्के बालके पळाली आहेत. सुरक्षा व्यवस्थेचे पालन होत नाही, अशा बालगृहांची मान्यता रद्द करावी, अशी शिफारसही समितीने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com