नागरिकांनो, फोनद्वारे थेट झेडपी सिईओंकडे मांडा गाऱ्हाणे

पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने येत्या गुरुवारी (ता.७) जिल्हास्तरीय फोन इन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Pune-ZP
Pune-ZPsakal
Summary

पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने येत्या गुरुवारी (ता.७) जिल्हास्तरीय फोन इन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे - जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समित्यांमधील (Panchyat Samiti) कामांच्या (Work) बाबतीत निर्माण झालेल्या समस्या (Problem) सोडविण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने येत्या गुरुवारी (ता.७) जिल्हास्तरीय फोन इन कार्यक्रमाचे (Phone Inn Event) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमुळे जिल्ह्यातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना फोनद्वारे थेट मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांच्याकडे त्यांचे गाऱ्हाणे मांडता येणार आहे. येत्या गुरुवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत सीईओ प्रसाद हे नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन, त्यावर मार्ग काढणार आहेत. प्रशासक काळातील हा पहिलाच फोन इन कार्यक्रम आहे.

या फोन इन कार्यक्रमामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिक आणि पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे कर्मचारी हे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाच्या (०२०) २६५५५६६६ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा १८०० २३३ ४१३० या टोल फ्री क्रमांकावर दिलेल्या वेळेत आपापल्या समस्या मांडू शकणार आहेत. या कार्यक्रमात नागरिकांकडून त्यांच्या गावातील समस्या काय आहेत, त्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेने काय प्रयत्न करणे गरजेचे आहे, याबाबतच्या विभागनिहाय नोंदी घेतल्या जाणार आहेत. या नोंदीनुसार नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढला जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी (ता.६) सांगितले.

या कार्यक्रमाच्यावेळी प्रसाद यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे आणि जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुख हे जिल्हा परिषद मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील सभागृहात उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषदेत सध्या प्रशासकराज चालू आहे. परिणामी नेहमी नागरिकांच्या समस्या घेऊन येण्यासाठी उपलब्ध असणारे पदाधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्य यासारखे पंचायतराज संस्थांचे लोकप्रतिनिधी उपलब्ध नाहीत. शिवाय गाव पातळीवरील नागरिक हे आपापली गाऱ्हाणे मांडण्यासाठी थेट जिल्हा परिषद मुख्यालयात येऊ शकत नाहीत. यावर मार्ग काढण्यासाठी हा कार्यक्रम सुरु केला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

‘यापुढे दर गुरुवारी फोन इन कार्यक्रम’

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना केवळ एकाच दिवसात त्यांच्या समस्या मांडता येणार नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा हा फोन इन कार्यक्रम यापुढे दर आठवड्याला आयोजित केला जाणार आहे. यानुसार दर गुरुवारी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com