देशातील काही विद्यापीठांमधील स्थिती काळजीची

Dr-Bhushan-Patwardhan
Dr-Bhushan-Patwardhan

पुणे - ‘देशातील काही विद्यापीठांमधील स्थिती काळजी वाटावी अशी आहे, ही शैक्षणिक संकुले राजकीय आणि वैचारिक संघर्षाची युद्धभूमी नाही. विद्यार्थ्यांनी राजकारण्यांचे बाहुले न बनता ज्ञान घेऊन आपले भविष्य घडवावे,’’ असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले. 

विश्‍वकर्मा विद्यापीठाच्या पहिल्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. या वेळी ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष प्रदीप भार्गवा, विद्यापीठाचे अध्यक्ष भरत अग्रवाल, कुलगुरू डॉ. सिद्धार्थ जबडे, विश्‍वस्त राजकुमार अगरवाल, अस्मिता अगरवाल उपस्थित होते. 
डॉ. पटवर्धन म्हणाले, ‘‘देशातील काही नामांकित विद्यापीठांमधील परिस्थिती बघून काळजी वाटते. या संस्था ज्ञान, शिष्यवृत्ती आणि गुणवत्ता प्राप्त करण्याची मंदिरे आहेत. विचारसरणी किंवा राजकीय पक्षांच्या स्वार्थासाठी विद्यापीठांना युद्धभूमी बनवण्याची गरज नाही. 

शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळून त्यांच्या जीवनाला आकार प्राप्त होतो. मानवी मूल्य रुजून भेदभाव कमी झाला पाहिजे. ज्ञानाचा उपयोग पर्यावरण आणि शांततेसाठी झाला पाहिजे. युवकांनी राजकारण्यांचे समर्थक न होता उच्चशिक्षण घेण्याकडे लक्ष द्यावे. 

आपली शैक्षणिक संकुले असामाजिक तत्त्वांपासून कशी सुरक्षित राहतील, याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com