बांधकामे थांबवा; मजुरांना निवारा द्या - डॉ. बाबा आढाव

Dr-Baba-Adhav
Dr-Baba-Adhav

पुणे - कोंढवा, आंबेगाव यांसारख्या घटना रोखायच्या असतील आणि महापालिकेला खरेच काही करायची इच्छा असेल, तर त्यांनी शहरातील सर्व बांधकामे थांबवून कामगारांना आधी सुरक्षित निवारा देण्याचे काम करावे, अशी मागणी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केली. 

आंबेगाव येथील दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘कोंढव्यातील घटनेनंतर दोघांना अटक झाली आहे, बाकीच्यांना अद्याप हात लावलेला नाही. यात सर्वांचे परत बिल्डर, कंत्राटदार यांचे व्यवस्थेशी लागेबांधे आहेत. लागेबांधे, देवाण- घेवाण जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत काहीही होणार नाही. हे कामगार बाहेरून आलेले आहेत, त्यांना इथे कोण बोलावले होते का, असा उलट प्रश्‍न विचारण्याचा उर्मटपणा या व्यवस्थेमध्ये आहे. बांधकाम कामगारांना आडोशासाठी सुरक्षित निवारा देणे, हे महापालिकेचे काम आहे. भिंत पडेपर्यंत याची वाट पाहण्याची गरज नाही. दुर्घटना घडल्यावर दाखवली जाणारी सहानुभूती कोरडी आहे. हे असले ‘मर्डर’ थांबले पाहिजेत.

आढाव म्हणाले, ‘‘२००८ मध्ये केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा कायदा केला आहे. यामध्ये नोंदणी झालेला कामगार देशभरात कोठेही काम करू शकतो. त्याच्यासाठी निधी, पेन्शन अशा तरतुदी आहेत; परंतु अंमलबजावणीची जबाबदारी केंद्राने राज्यांवर टाकली आहे. अनेक राज्यांनी ती विमा कंपन्यांवर टाकली आहे. आपल्या राज्याने तर कायदा स्वीकारलेलाही नाही. आपल्याकडे सर्व काही आहे, फक्त कामगारांचे भले करण्याची इच्छाशक्ती नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com