कालव्यावरून नाही तर कालव्यात जाण्यासाठी पूल

PUL.jpg
PUL.jpg

पुणे : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्‍यातील पापळवाडी येथे चासकमान डाव्या कालव्यावरील पूल कालवा ओलांडण्यासाठी आहे की, कालव्यात जाण्यासाठी आहे, हेच कळत नाही. या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

पापळवाडी ते आखरवाडीसाठी चासकमान धरणाचा कालवा ओलांडून जावे लागते. यासाठी कालव्यावर सुमारे वीस ते बावीस वर्षांपूर्वी लोखंडी पूल उभारण्यात आला होता. पूल उभारताना लोखंडी सांगाडा व वर सिमेंटच्या स्लिपर टाकण्यात आल्या होत्या. मात्र, गेली काही वर्षांपासून सांगाड्यावरील काही ठिकाणच्या सिमेंटच्या स्लिपर तुटून कालव्यात पडल्या आहेत. या
पुलावरून त्याच स्थितीत धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू आहे. पुलावरून शालेय विद्यार्थी, शेतीमालाची वाहतूक तसेच नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र, हा पूल धोकादायक झाल्याने बैलगाडीसह दुचाकीवरून शेतीमालासह अन्य वाहतूक सुमारे दोन किलोमीटरचा वळसा मारून करावी लागत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार निवेदने
देऊनही पाटबंधारे विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने या पुलावरून कालव्यात पडून अपघात होण्याचा धोका असूनही याची डागडुजी वा नवीन पूलही होत नाही. वारंवार मागणी करूनही पुलाची डागडुजी होत नसल्याने माजी उपसरपंच अरुण चिंतामण चव्हाण यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. 

पुलाविषयी निवेदन प्राप्त झाले असून, या बाबत प्रशासकीय पातळीवर वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. वरिष्ठांकडून आदेश प्राप्त होताच पुलाची दुरुस्ती तातडीने करण्यात केली जाईल व पूल सुरक्षित करण्यात येईल, असे चासकमान धरणाचे शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com