पुण्यातील तिहेरी हत्याकांडातील आरोपीची फाशी कायम

death penalty to accused in pune triple murder case
death penalty to accused in pune triple murder case

मुंबई : जन्मदात्या आईचा आणि दोन वर्षाच्या निरागस मुलीचा अत्यंत क्रूरपणे खून करणाऱ्या आरोपीच्या प्रवृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा  होईल, असे वाटत नाही, असे निरीक्षण नोंदवित मुंबई उच्च न्यायालयाने आज पुण्यातील तिहेरी हत्याकांडमधील आरोपी विश्‍वजीत मसाळकरची फाशीची शिक्षा कायम केली. 

वानवडी पोलिस विभागाच्या हद्दीत राहणाऱ्या मसाळकरने ऑक्‍टोबर 2012 मध्ये स्वतःच्या आईचा, पत्नीचा आणि मुलीचा निर्घृणपणे खून केला होता. त्याचे त्याच्या कार्यालयातील एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच त्याने या हत्या कटकारस्थान करुन केल्याचा आरोप अभियोग पक्षाने ठेवला आहे. पुणे सत्र न्यायालयाने सन 2013 मध्ये आरोपीला फाशीची सजा सुनावली आहे. ही शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयात याचिका केली होती तर आरोपीनेही शिक्षेविरोधात अपील केले होते. न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने आज याचिकांवर 68 पानी निकालपत्र जाहीर केले. आरोपीने आपल्या आई अर्चनाला आणि दोन वर्षाची मुलगी किमयाला ज्या थंड डोक्‍याने ठार केले आहे ते पाहता त्याच्यामध्ये भविष्यात कोणतीही सुधारणा होईल, असे वाटत नाही. आरोपीची फाशी रद्द करण्यासाठी किमान तो त्यासाठी लायक असावा लागतो. मात्र मसाळकर पुन्हा समाजात जाऊन चांगले वर्तन करु शकेल असे त्याच्या कृत्यावरुन वाटत नाही. त्यामुळे तो कोणत्याही दयेला पात्र नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

जन्मदात्या आईचा आणि दोन वर्षाच्या निरागस मुलीचा अत्यंत क्रूरपणे खून करणाऱ्या आरोपीच्या प्रवृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होईल, असे वाटत नाही, असे निरीक्षण नोंदवित मुंबई उच्च न्यायालयाने आज पुण्यातील तिहेरी हत्याकांडमधील आरोपी विश्‍वजीत मसाळकरची फाशीची शिक्षा कायम केली. 

वानवडी पोलीस विभागाच्या हद्दीत राहणाऱ्या मसाळकरने ऑक्‍टोबर 2012 मध्ये स्वतःच्या आईचा, पत्नीचा आणि मुलीचा निर्घृणपणे खून केला होता. त्याचे त्याच्या कार्यालयातील एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच त्याने या हत्या कटकारस्थान करुन केल्याचा आरोप अभियोग पक्षाने ठेवला आहे. पुणे सत्र न्यायालयाने सन 2013 मध्ये आरोपीला फाशीची सजा सुनावली आहे. ही शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयात याचिका केली होती तर आरोपीनेही शिक्षेविरोधात अपील केले होते. न्या. बी पी धर्माधिकारी आणि न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने आज याचिकांवर 68 पानी निकालपत्र जाहीर केले. आरोपीने आपल्या आई अर्चनाला आणि दोन वर्षाची मुलगी किमयाला ज्या थंड डोक्‍याने ठार केले आहे ते पाहता त्याच्यामध्ये भविष्यात कोणतीही सुधारणा होईल, असे वाटत नाही. आरोपीची फाशी रद्द करण्यासाठी किमान तो त्यासाठी लायक असावा लागतो. मात्र मसाळकर पुन्हा समाजात जाऊन चांगले वर्तन करु शकेल असे त्याच्या कृत्यावरुन वाटत नाही. त्यामुळे तो कोणत्याही दयेला पात्र नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

आरोपीने त्याच्या बचावामध्ये केलेल्या युक्तिवादात सांगितले होते की, पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी कुटुंब न्यायालयात दावा केला होता. त्यामुळे हत्या करण्याचे कारण नव्हते, असा दावा आरोपीच्या वतीने करण्यात आला होता. मात्र अभियोग पक्षाने हा दावा फेटाळला होता. घरामध्ये झालेल्या सामानांच्या तोडफोडीवरुन त्याने चोरीचा बनाव केला असला तरी सीसीटीव्ही व अन्य पुराव्यांवरुन त्याने हत्या केल्याचे उघड होते, असे अभियोग पक्षाच्या वतीने वकिल अराफत सैत यांनी मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com