‘वीजबिल माफीची मागणी करणार’

‘वीजबिल माफीची मागणी करणार’

शिक्रापूर - राज्याची आर्थिक स्थिती सध्या अडचणीची असली तरीही सध्याच्या दुष्काळी स्थितीमुळे वीजबिल पूर्णतः माफ करावे, अशी मागणी विधिमंडळाच्या सोमवार (ता. १९) पासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात करणार असल्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. 

पाबळ - केंदूर जिल्हा परिषद गटातील दुष्काळी स्थितीचा आढावा वळसे पाटील यांनी घेतला. पाबळ - केंदूर गटासाठी १३ टॅंकर मंजूर झाले असून, केंदूर व पाबळला प्रत्येकी दोन टॅंकरच्या दररोज सात खेपा असे नियोजन झाले आहे. या वेळचा दुष्काळ भयंकर असल्याने पाबळ-केंदूर गटातील ऊसतोडणीस प्राधान्य देण्याच्या सूचना भीमाशंकर कारखान्याला केल्या आहेत, असे वळसे पाटील यांनी सांगितले. 

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, शंकर जांभळकर, केशरताई पवार, सविता बगाटे, सविता पऱ्हाड, सदाशिवराव पवार, पांडुरंग ताथवडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आबा पऱ्हाड यांनी केले. आभार उद्योगपती प्रमोद पऱ्हाड यांनी मानले. 

कळमोडी धरणाची वस्तुस्थिती समजून घ्या
थिटेवाडी बंधाऱ्यात कळमोडीचे पाणी आणण्याच्या मागणीबाबत दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले, की कळमोडी प्रकल्पाचा आराखडा निश्‍चित आहे. थिटेवाडीत पाणी आणणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. कळमोडीची मूळ योजना ही चासकमानच्या  पाण्याचा तोटा भरून काढण्यासाठी झाली आहे. विदर्भ - मराठवाड्याच्या अनुशेषाच्या अटीमुळे अशा नवीन प्रस्तावांबाबत सरकारस्तरावरही काही करणे कठीण झाले आहे. कळमोडीची वस्तुस्थिती समजून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com