पवळेवाडी व कोंडिवडे गावाचे पुनर्वसन करण्याची गावकऱ्यांची मागणी

पवळेवाडी व कोंडिवडे गावाचे पुनर्वसन करण्याची गावकऱ्यांची मागणी

टाकवे बुद्रुक - शिरे शेटेवाडीच्या धर्तीवर आंदर मावळातील पवळेवाडी व कोंडिवडे गावाचे पुनर्वसन करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. मावळचे तहसीलदार रणजित देसाई यांना अॅड. सोमनाथ पवळे, माजी उपसरपंच युवराज पवळे, गणेश पवळे, जालिंदर पवळे, गोपाळ पवळे, देवराम तलावडे, संभाजी कडू आदि गावकऱ्यांनी या आशयाचे निवेदन दिले आहे. 

१९९९ मध्ये शासनाने मंगरूळ गावाजवळ आंद्रा धरण बांधले. यासाठी परिसरातील जमिनींचे संपादन करण्यात आले. शासनाने अद्याप या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला दिला नाही. धरणग्रस्तांचे प्रश्नही पडून आहे. पवळेवाडी गावाच्या वेढयावर पाणी आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा आरोग्य व शिक्षणाचा प्रश्न आहे. या धरणात पाणी साठवण करण्यापूर्वी पवळेवाडीतून मधल्या रस्त्याने फळणे फाटयावरून टाकवे बुद्रुक या बाजारपेठेच्या गावात दळणवळणाची सोय होती. आता मात्र कल्हाट फाट्यावरून जावे लागते. 

धरणात जमिनी संपादन झाले, त्यातच नदीकाठावरील जनावरांचे गोठे, राहत्या पडाळी आणि घरे पाण्यात गेली. त्यामुळे गावातील बहुतेक नागरिक शहरात भाड्याने घरे घेऊन राहत आहेत. गावकऱ्यांना राहायला हक्काचे घर नाही. शिरे शेटेवाडीच्या धर्तीवरच पवळेवाडी, कोंडिवडेचे पुनर्वसन करावे या मागणीने जोर धरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com