Bhalchandra-Mungekar
Bhalchandra-Mungekar

सरकारच्या धोरणांमुळे मंदी - डॉ. मुणगेकर

पुणे - ‘केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशात मंदीची लाट आली आहे. त्यावर तातडीने उपयोजना केल्या नाही, तर मंदी आणखी तीव्र होण्याची भीती केंद्रीय नियोजन समितीचे माजी सदस्य आणि अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. 

देशातील हे आर्थिक संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन अर्थतज्ज्ञांची परिषद बोलविण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली. काँग्रेस भवनात ‘अर्थव्यवस्थेची सद्यःस्थिती व त्यावर उपाययोजना’ या विषयावर त्यांनी संवाद साधला. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, अजित दरेकर, गोपाळ तिवारी उपस्थित होते.

ते म्हणाले, ‘‘नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. परंतु सरकार ते कबूल करण्यास तयार नाही. सर्वच क्षेत्रांना सध्या मंदीचा फटका बसत आहे. देशाचे राष्ट्रीय उत्पन्न कमी झाले आहे. बेरोजगारांची संख्या वाढली आहे.’’

या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारी गुंतवणूक वाढवावी, मनरेगा सारख्या कल्याणकारी योजनांना भरभक्कम निधी द्यावा, औद्योगिक आणि बांधकाम क्षेत्राला जीएसटीमध्ये सवलत द्यावी, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात भरीव गुंतवणूक करावी आदी उपयोजनांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com