केंद्राकडून पुन्हा दर वाढू नयेत हीच जनतेची अपेक्षा

उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचा घेतला समाचार; इंधन दर कपातीचे धोरण
Ajit Pawar
Ajit PawarSakal

माळेगाव - केंद्र सरकारने इंधनाच्या दरात कपात केल्याने जनतेला काहीसा दिलासा मिळाला ही गोष्ट खरी आहे, परंतु अधिकची इंधन दरवाढ करायची आणि पुन्हा जनतेच्या आक्रोश विचारत घेत  इंधनाचे दर कमी करायचे, हे कितपत योग्य आहे. यापुढे तरी कमी झालेले दर  केंद्राकडून पुन्हा यानात्या कारणाने वाढू नयेत हीच जनतेची अपेक्षा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राच्या धोरणात्मक निर्णयाचा समाचार घेतला.

महाराष्ट्र सरकारनेही अर्थसंकल्पामध्ये गॅस सिलेंडरची किंमत कमी होण्यासाठी एक हजार कोटींचा टॅक्स कमी केल्याचे त्यांनी आवर्जन सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी पवार बोलत होते. इंधन दर कपात, गॅस सिलेंडरवरील टॅक्स कमी करणे, उजनीचे पाणी, आगामी पालखी सोहळ्याचे नियोजन आदी प्रश्नांना पवार य़ांनी समर्पक उत्तरे दिली.

ते म्हणाले, `` महाराष्ट्रासह देशभर इंधन दरवाढीबाबत जनतेमध्ये आक्रोश होता. प्रसारमाध्यमांमध्येही केंद्राच्या भूमिकेविरुद्ध आवाज उठविला होता. त्यामुळेच केंद्राने पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलेंडरच्या किंमती कमी होण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला. वास्तविक केंद्राने सुरवातीलाच मोठ्या प्रमाणात इंधन, गॅस दरवाढ केली होती आणि आता हेच दर कमी केले आहेत. ठिक आहे गॅससह पेट्रोल, डिझेल प्रतिलिटर कमी झाल्याचे समाधान आहे. परंतु यापुढे पुन्हा इंधनाची दर वाढ केंद्राने करू नये. अन्यथा जागतिक पातळीवर इंधनाचे दर वाढल्याने पुन्हा दर वाढ केल्याशिवाय आम्हाला पर्य़ाय नव्हता असे केंद्राकडून होऊ नये, अशी जनतेची अपेक्षा आहे.``

`` महाराष्ट्र सरकारनेही गॅस सिलेंडरच्या किंमती कमी होण्यासाठी अर्थसंकल्प सादर करताना सिलेंडरवर असणारा साडेतेरा टक्के टॅक्स साडेदहा टक्क्याने कमी केला. त्यामुळे राज्य सरकारला १ हजार कोटींचा टॅक्स सोडून द्यावा लागला. परिणामी सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्याने केला आहे.`` सोलापूरकरांचा उजनीच्या पाण्यासंदर्भात आंदोलनाचा पवित्रा आहे, या प्रश्नावर पवार म्हणाले,`` उजनीच्या पाण्याचे वाटप पुर्वीच झालेले आहे. मंजूर झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांबरोबर त्याचवेळीच इंदापूर तालुक्यातील काही गावांना पाणी मंजूर झालेले आहे. अनेक वर्षांपासून यानात्या कारणाने इंदापूरची योजना मागे पडत होती. परंतु आता त्याला राज्य सरकारने प्रशासकिय मान्यता दिली. ही वस्तूस्थिती सोलापूरकरांनी समजून घ्यावी. यापुढील काळात निराखोऱ्यातील पाणी आपण भिमा खोऱ्यात घेऊ जात आहोत. त्या प्रकल्पातून मराठवाड्यालाही पाणी देणार आहोत. शेवटी सर्वांनी पाणी वाटपाबाबत समज्यसाची भूमिका ही घेतली पाहिजे. धरणे होत असताना पुणे, सोलापूर, नगर आदी जिल्ह्यातील लोकांच्या जमिनी बाधीत झाल्या आहेत, याचाही विचार सर्वांनी केला पाहिजे,`` असे आवाहन पवार यांनी केले.

सायन्स सेंटरच्या उद्धाटनाबाबत दुजोरा...!

माळेगावच्या सायन्स सेंटरच्या उद्धाटनाला भाजपचे केंद्रीय मंत्री येणार आहेत. हे जरी खरे असले तरी शेवटी केंद्रातील निधी ज्या वेळस एखाद्या प्रकल्पाला मिळतो त्यावेळस पवारसाहेबांनी जर संबंधित मंत्र्यांना निमंत्रण दिले तर वावग काय आहे. शेवटी सर्वच ठिकाणी राजकारण आणून चालत नाही. हेही सर्वांनी ध्यानत घेतले पाहिजे, अशा शब्दात अजित पवार यांनी माळेगावच्या सायन्स सेंटरच्या उद्धाटनाबाबत खुलासा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com