पुणे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुंबई विमानतळावर विमानातून उतरावं लागल्यामुळं त्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. चूक राज्यपालांची की, राज्य सरकारची? या विषयी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर राज्य सरकारकडून खुलासा करण्यात आला असला तरी, आज, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयी सरकारची भूमिका मांडली आहे.
राज्य सरकारने प्रवासासाठी विमान नाकारल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 'मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदल्या दिवशी विमान उपलब्ध नसल्याबाबत राजभवन येथे कळविण्यात आले होते. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
राज्यपाल हे अतिमहत्त्वाचे व्यक्ती आहेत. ते प्रवास करणाऱ्या विमानात काही बिघाड होता का? शेवटी विमानही तंदुरुस्त असणे गरजेचे आहे.'
विधान परिषदेवरील 12 आमदारांच्या नियुक्त्यांबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने एकमताने पारित केलेला प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. त्याला बरेच दिवस उलटूनही राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे विमान नाकारल्याची चर्चा होत आहे. या प्रश्नावर पवार यांनी 'अशा पद्धतीचा विचार महाविकास आघाडी सरकार करणार नाही' असे स्पष्ट केले.
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.