मराठा समाजाच्या आक्रोशात दुटप्पी सरकार नामशेष होईल- धनंजय जाधव

dhananjay jadhav.png
dhananjay jadhav.png

पुणे- राजकीय पक्षांचे मोर्चे, आंदोलनं होऊ शकतात, मग मराठा क्रांती मोर्चाचा आवाज का दाबला जातो. हे सरकार मराठा क्रांती मोर्चाला वेगळी वागणूक देत आहे. मराठा समाजाच्या आक्रोशात हे दुटप्पी सरकार नामशेष होईल, अशी टीका मराठा क्रांती मोर्चा समन्वयक धनंजय जाधव यांनी केली आहे.

पंढरपुर येथून मराठा क्रांती मोर्चा मशाल मोर्चाला महाराष्ट्र राज्य सरकारने परवानगी नाकारली व नोटीस देत संपूर्ण सोलापूर जिल्हात संचार बंदी लागू केली आहे. तर दुसरीकडे मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी देखील आज मशाल मोर्चा होता त्याला देखील परवानगी नाकारली आहे.

एकीकडे वंचित आघाडीचे पंढरपूर येथे झालेल्या आंदोलनात प्रशासन सहकार्य करते त्यांचे शिष्ठमंडळ मंदिरात जाते तर मराठा क्रांती मोर्चाला दुजाभाव का ? केंद्र सरकारने शेतकरी कायदा लागू केला त्याला विरोध करणारी कॉंग्रेसची आंदोलन होतात. अर्नब गोस्वामीला झालेल्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन होते. राष्ट्रवादी काँग्रेसची सभा , आंदोलन , धरने होतात, तर मराठा क्रांती मोर्चाला ही वागणूक अयोग्य आहे. मराठा समाजाच्या आक्रोशात या दुटप्पी सरकारचा नाश होईल, असं धनंजय जाधव म्हणालेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com