रेल्वे पासधारकांची गैरसोय

रेल्वे पासधारकांची गैरसोय

पुणे - सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांची ट्रेन पकडायची म्हणजे किमान पहाटे ५ वाजता उठावे लागते. स्थानकावर पोचल्यावर समजते की गाडी रद्द झाली आहे. त्याचा एसएमएस आला असता तर, त्रास वाचला असता. गाडी लेट झाल्याचीही माहिती स्थानकावरच समजते. खरं तर एसएमएसचे प्रभावी माध्यम उपलब्ध असताना, मध्य रेल्वे मात्र त्या पासून दूर आहे... अशी व्यथा मांडत होते पुणे- मुंबई असा दररोज प्रवास करणारे प्रवासी दीपक शेगर. गाड्या रद्द झाल्या किंवा गाड्यांना उशीर झाला तर, पासधारकांना अजूनही एसएमएस मिळत नाहीत ही त्यांची समस्या. 

पुणे- मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणारे सुमारे तीन ते पाच हजार प्रवासी आहेत. रेल्वे गाडी रद्द झाली किंवा तीन तासांपेक्षा जास्त वेळ उशीर होणार असेल तर, आरक्षण करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्य रेल्वेचे एसएमएस जातात. परंतु, पासधारकांना अद्याप या सुविधेचा लाभ मिळत नाही. पासधारकांनाही ही सुविधा मिळावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा, पुणे- दौंड प्रवासी संघाचे विकास देशपांडे, पुणे- मुंबई प्रवासी संघाचे अध्यक्ष हेमंत टपाले यांनी केली. 

पासधारकांचे मोबाईल क्रमांक घेतले जात नाहीत. पासच्या यंत्रणेत हे क्रमांक नोंदविण्याची सुविधा नाही. परंतु, पासधारकांची मागणी वरिष्ठ कार्यालयाला कळविली जाईल. एखादी गाडी रद्द झाली किंवा उशीर होणार असेल, तर त्याची माहिती प्रवाशांना  @drmpune ट्‌विटरवर कळविली जाते. 
- कृष्णाथ पाटील, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com