Aditya Thackeray : वेताळ टेकडीवर बेताल विकास नको - आदित्य ठाकरे

स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही वेताळ टेकडीवर बेताल विकास नको. अन्यथा आक्रोश होईल’’ अशी भूमिका घेत या प्रकल्पास विरोध केला.
Dont want unnecessary development on vetal tekdi Aditya Thackeray pune
Dont want unnecessary development on vetal tekdi Aditya Thackeray puneesakal

पुणे : पुणे महापालिकेने वेताळ टेकडीवरून प्रस्तावित केलेल्या रस्त्याला विरोध होत असताना त्यास पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

त्यावेळी त्यांनी ‘‘नागरिकरन वाढत असले तरी त्यामध्ये अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना आहेच. त्यामुळे ही टेकडी जपली पाहिजे. स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही वेताळ टेकडीवर बेताल विकास नको. अन्यथा आक्रोश होईल’’ अशी भूमिका घेत या प्रकल्पास विरोध केला.

शनिवारी दुपारी आदित्य ठाकरे यांनी वेताळ टेकडी येथे स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी सुमिता काळे, प्राजक्ता दिवेकर, गौरी मेहेंदळे, योगेश आळंदकर, पृथ्वीराज लिंगायत, राजकुमार खडके, बाबा सय्यद आदी उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

वेताळ टेकडीच्या पायथ्याशी कांचन गल्ली येथे आदित्य ठाकरे यांनी स्थानिक नागरिकांची भेट घेतली. यावेळी नागरिकांनी महापालिकेचा प्रकल्प कसा आहे, त्यातील त्रुटी दाखवून देत त्यांची भूमिका मांडली.

त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी या वेताळ टेकडीच्या या विषयावर मी लक्ष ठेवून आहे. स्थानिक नागरिकांनाच हा प्रकल्प नको असेल तर तर मग कोणासाठी हा रस्ता करत आहेत, असा प्रश्‍न उपस्थित केला. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली ही टेकडी जपली म्हणत त्यांना पाठिंबा दिल.

पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, ‘‘शाश्‍वत विकास करण्यासाठी सक्षम पीएमटी सक्षम करा, खासगी वाहने कशी कमी होतील यासाठी मोबिलिटी प्लॅन करणे आवश्‍यक आहे. महापालिकेने स्थानिक नागरिकांना विश्वसात घेतले पाहिजे.

राज्यात गेल्या सात ते आठ महिन्यांपासून नागरिकांचा विरोध असतानाही पर्यावरणाला हानी होणारे प्रकल्प हुकूमशाही पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापालिकेने स्थानिकांना विचारत न घेता हा प्रकल्प करण्याचा प्रयत्न केल्यास आक्रोश होईल.

नदी सुधार प्रकल्पात पर्यावरण विभागाची परवानगी घेताना तेथे एकही झाड तोडले जाणार नाही असे सांगून परवानगी घेतली आहे. पण आता साडेसहा हजार पेक्षा जास्त झाडे तोडली जाणार आहेत. नदी सुशोभित करण्यापेक्षा त्या आधी स्वच्छ करणे आवश्‍यक आहे. बाहेरचे सल्लागार येऊन नद्यांची वाट लावतात, त्यापेक्षा स्थानिकांना समजून घेणे आवश्‍यक आहे, असेही ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडी भक्कम

महाविकास आघाडी भक्कम आहे, आम्ही सत्तेसाठी किंवा पदासाठी एकत्र आलेले नसून, संविधान वाचविण्यासाठी एकत्र आलेलो आहेत. आमची वचनबद्धता ५० खोक्यांसारखी नाही तर संविधान टिकविण्यासाठी आहे. उन्हाळा संपल्यानंतर आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या सभा पुन्हा घेणार आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com